भारतात मे मासाच्या मध्यापासून प्रतिदिन ५ सहस्र कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होऊ शकतो !

वॉशिंग्टन विद्यापिठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

नवी देहली – अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापिठाच्या ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ने तिच्या अभ्यासात भारतात कोरोनामुळे मे मासाच्या मध्यामध्ये प्रतिदिन ५ सहस्रांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अभ्यासात दुसर्‍या लाटेचा सामना करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.

१० मे या दिवशी ५ सहस्र ६०० जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. यासह १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ सहस्र जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ सहस्र मृत्यू होऊ शकतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment