१७ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदन आणि
रंगपंचमी या उत्सवांच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती
पुणे, २५ मार्च – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.
१७ वर्षांपासूनचे अथक प्रयत्न आणि प्रबोधन यांमुळे धूलिवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांमधील अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी हिंदू जागृत झाल्याचे दिसून आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून रंगाने माखलेल्यांना पाण्यात उतरण्यास प्रतिबंध केल्याने जलाशयाचे संभाव्य प्रदूषण रोखले गेले. जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे शक्य झाले. या अभियानात खडकवासल्यातील ग्रामस्थ, ‘कमिन्स इंडिया’ या आस्थापनाचे ६० हून अधिक कर्मचारी, सनातन संस्था, तसेच रणरागिणी शाखा यांचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता.
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
चिपळूण-पाग येथील श्री सुकाईदेवी मंदिरात सनातन संस्था आयोजित संस्कार प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आध्यात्मिक साधनाच व्यक्तीला तणावमुक्त करू शकते ! – रणजित प्रसाद, सनातन संस्था
सांगली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !