त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील आनंद आखाड्याचे स्वामी शिवज्ञानानंद सरस्वती महाराज यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
आश्रमात आल्यावर मला साधकांचे दर्शन झाले. साधकांचे दर्शन म्हणजे दिव्य आत्म्याचे दर्शन आहे. आपण जसे यात्रेला जातो, त्याप्रमाणेच जीवन हीसुद्धा एक यात्रा आहे. भाग्याचे जीवनात ५ टक्के, कर्माचे २० ते २५ टक्के, तर संकल्पाचे जीवनात ७० ते ७५ टक्के महत्त्व आहे.