ईश्‍वराला प्रार्थना आणि अग्निहोत्र करण्यासह विविध उपाय करून नियमित साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेकांच्या मनात भय, नकारात्मता, निराशा वाढली आहे, तसेच काहींच्या मानसिक संतुलनावरही विपरीत परिणाम झाला आहे. अशा स्थितीत नियमित साधना केल्याने मानसिक तणाव, भीती न्यून होऊन मन चिंतामुक्त होते आणि आनंदी राहू शकते.

कोरोनासह प्रत्येक व्याधीवर उपचार करतांना त्यामागील आध्यात्मिक कारणांचा विचार होणे आवश्यक ! – डॉ. ज्योती काळे, सनातन संस्था

कोरोनाची पहिली लाट संपते ना संपते, तोच दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. आता अन्य बुरशीजन्य आजारही येत आहेत. काही कालावधीने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच वर्षभर वादळ, पूर अशी संकटांची मालिका चालूच आहे. कोरोनावर उपचार करतांना औषधे, ऑक्सिजन, लस हे सर्व उपलब्ध होऊनही लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनासह उपचार करणारे डॉक्टरही परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत.

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)’ या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २६ मे या दिवशी, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असलेल्या योगतज्ञ प.पू. दादाजी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या कल्याण येथील ‘अदृश्य छाया’ या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात पार पडला. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी पू. प्रमिला वैशंपायन यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

देवर्षि नारद

देवर्षि नारद हे भगवान विष्णूंचे मोठे भक्त आहेत. हिंदु धर्मात त्यांना ब्रह्माचे पुत्र मानले जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत.

दीर्घकाळ धान्य साठवणूक करता येईल, अशा लहान आणि मोठ्या आकाराच्या गोडाऊनचे बांधकाम अल्प खर्चात कसे करावे, याची माहिती कळवा !

आपत्काळाच्या दृष्टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे असलेल्या ठिकाणी अन्नधान्य साठवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान किंवा मोठी गोडाऊन बांधण्याची आवश्यकता आहे. आपत्काळाचा कालावधी पहाता गोडाऊनमध्ये ५-६ वर्षे धान्य टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती आवश्यक आहे.

५-६ वर्षांसाठी पाण्याची साठवणूक करण्याच्या अल्प दरातील पद्धतींची माहिती कळवा !

आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने माहिती आवश्यक आहे.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीयांच्या वतीने व्यापक प्रमाणात करण्यात आला ‘ऑनलाईन’ अध्यात्मप्रसार !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामाजिक माध्यमे यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला.

गुरुभक्तीचा आदर्श असलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे शिष्य प.पू. भास्करकाका !

वडाळा महादेव (जिल्हा नगर) येथील महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका कुशाग्र आणि बुद्धीवान होते. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांनी मद्रास (आयआयटी) येथेसुद्धा शिक्षण घेतले होते. त्यांनी महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची ३५ वर्षे निरंतर सेवा केली.

साधना करून अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

प्रशासनाला निवेदने देणे आणि पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे आदी सर्व गोष्टी अधिवक्त्यांच्या वतीने होऊ शकतात. यांसह दंगलग्रस्त भागातील पीडित हिंदू आणि गोरक्षक आदी सर्व हिंदू बांधवांना अधिवक्ते वेळोवेळी साहाय्य देऊ शकतात. अधिवक्ते करत असलेल्या कार्याला त्यांनी साधनेची जोड द्यायला हवी. ईश्‍वरावर निष्ठा असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकते. राष्ट्र-धर्मावर होत असलेल्या आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार्‍या उपक्रमांत सहभागी होऊन गुरुप्राप्तीचे ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न वाढवूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोना संसर्गाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती वाढत चालल्या आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. साधना वाढवण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ ही अमूल्य संधी साधकांना प्राप्त झाली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधकांनी विहंगम अध्यात्मप्रसार करून गुरूंची कृपा संपादन करूया. गुरूंनी सूक्ष्मातून सर्व कार्य केलेलेच आहे, आपण केवळ निमित्तमात्र आहोत. गुरुपौर्णिमेला केवळ ६० दिवस शेष आहेत.