
नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) – नागदेववाडी येथील ग्रामस्थ दीप अमावास्येला ‘गटारी अमावास्या’, असे म्हणत असत. हा अपप्रचार आहे हे लक्षात घेऊन येथील ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी गावात या सणाविषयीचे धर्मशास्त्र सांगून याविषयी जागृती केली. याच समवेत हा सण कशाप्रकारे साजरा करणे आवश्यक आहे ? हे सांगून तो साजरा केल्यानंतर ‘दिवे लावलेली छायाचित्रे पाठवा’, असे आवाहन ग्रामस्थांना केले.
या प्रबोधनामुळे या वर्षी गावात कोणीही दीप अमावास्येविषयी अयोग्य शब्दप्रयोग केला नाही, तसेच अनेकांनी घरी धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी केली. पुढील वर्षी या संदर्भात एक पाऊल पुढे टाकत अनेकांनी गावातील प्रत्येकच घरी दीप अमावास्या धर्मशास्त्रानुसार साजरी होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला आहे ! (धर्मशास्त्रानुसार दीप अमावास्या साजरी होण्यासाठी पुढाकार घेणार्या ‘भगवा रक्षक’चे धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील आणि नागदेववाडी ग्रामस्थ यांचे अभिनंदन ! इतरत्रच्या गावांनीही नागदेववाडीचे अनुकरण करावे ! – संपादक)
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...