सातारा – गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’व्याख्यानमाला घेण्यात आली. याला जिज्ञासू, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक आणि धर्माभिमानी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानमालेत आपत्काळातील गणेशोत्सव, गणेशोत्सवामागील शास्त्र आणि धर्माचरणाची आवश्यकता, मंदिरांचे महत्त्व, नैसर्गिक आपत्ती आणि त्याची आध्यात्मिक कारणे, सात्त्विक आहाराचे महत्त्व आणि अग्निहोत्राचे महत्त्व, हिंदु धर्मातील महिलांचे स्थान आणि शौर्यजागृती, प्रथमोपचाराची आवश्यकता, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श हिंदवी स्वराज्य आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता हे विषय घेण्यात आले. या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला प्रतिदिन सरासरी १५० हून अधिक, तर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाला ४१४ उपस्थिती होती.

सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !