यातून ‘हिंदु धर्म किती प्राचीन आहे आणि त्याच्याकडे किती प्रगत ज्ञान होते’, हे लक्षात येते ! आतातरी भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदु धर्मावर श्रद्ध ठेवतील का ? कि आताही त्यांच्या बुद्धीचा किस पाडत रहातील ?
नवी देहली – भारतात ‘कल्प विग्रह’ या नावाने ओळखली जाणारी भगवान शंकराची धातूची मूर्ती आतापर्यंत जगात सापडलेल्या अनेक मूर्तींपैकी सर्वांत प्राचीन मूर्ती समजली जाते. ही मूर्ती एका लाकडी पेटीत ठेवलेली होती. या पेटीवर आणि तिच्या भेगांत साठलेल्या सेंद्रिय गाळावर अमेरिकेतील बर्कली येथील कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ‘कार्बन डेटींग’ प्रक्रिया करून तिचे वयोमान शोधण्यात आले असता, ही मूर्ती २८ सहस्र ४५० वर्ष प्राचीन असल्याचे आढळून आले. म्हणजेच ही मूर्ती कलियुगातील (सध्या कलियुगाचे ५ सहस्र १२२ वे वर्ष चालू आहे) नसून ती द्वापरयुगातील असल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयीची माहिती प्रसिद्ध पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांनी ट्वीट करून दिली आहे. ‘२८ सहस्र ४५० वर्षांपूर्वी इजिप्त, ग्रीस, मेसोपोटेमिया, मोहेंजोदारो-हडप्पा संस्कृतीही अस्तित्वात नव्हती’, असे महमंद यांनी यात म्हटले आहे.
के.के. महंमद हे श्रीरामजन्मभूमी उत्खनन करणार्या पथकात सहभागी होते. ‘ही भूमी श्रीरामाचीच जन्मभूमी आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवण्यात के.के. महंमद यांनी दिलेल्या अहवालाचा मोठा वाटा होता.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...