
पनवेल – गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या चैतन्यदायी सोहळ्यात पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती शांताराम दळवीआजी (वय ८३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची भावपूर्ण घोषणा केली. त्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ७७ व्या संत आहेत. ‘श्रीमती दळवीआजींना जीवनात अत्यंत खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक शारीरिक आजारही आहेत; परंतु ही सर्व परिस्थिती त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकारली आहे. याही स्थितीत त्यांचा कृतज्ञतेचा भाव सतत जागृत असतो. त्यामुळे श्रीमती दळवीआजी आज संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे पू. (सौ.) अश्विनी पवार या वेळी म्हणाल्या.
श्रीमती दळवीआजी संत झाल्याची वार्ता ऐकून उपस्थित सर्वांची भावजागृती झाली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी परात्पर गुरु पांडे महाराज, तसेच आश्रमातील सर्व संत आणि साधक उपस्थित होते.
पू. (श्रीमती) सत्यवती शांताराम दळवीआजींचा सन्मान पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा जोशी यांनी केले. पू. (श्रीमती) दळवीआजी यांची गुणवैशिष्ट्ये उपस्थित संतांसह साधकांनी सांगितली.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...