साधकांनी नामजपादी उपायांना बसतांना पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे तोंड करून बसावे !

‘सनातनचे आश्रम, सेवाकेंद्रे किंवा साधकांची निवासस्थाने येथे साधक प्रतिदिन स्वतःवर नामजपादी उपाय होण्यासाठी बसतात. उपायांचा लाभ होण्यासाठी नामजपाला बसतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

‘तीव्र आपत्काळात केवळ साधनाच मनुष्याला वाचवू शकेल’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी वेळोवेळी केलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळात जीवनावश्यक वस्तू, औषधे यांविना हाल होऊ नयेत, यासाठी स्थुलातून पूर्वसिद्धता करण्याविषयी जागृती केली. त्यासह आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांची आध्यात्मिक स्तरावर सिद्धताही ते करवून घेत आहेत. आता कोरोना महामारीच्या काळातच बाह्य परिस्थिती इतकी प्रतिकूल झाली आहे, तर भावी भीषण आपत्काळात काय स्थिती असेल ?

प्रतिकूल परिस्थितीत देवाची कृपाच आपणास तारून नेऊ शकते, नामस्मरणाने मनोबल वाढते ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

विशिष्ट पद्धतीने केलेला नामजप आपणास कोरोना महामारीच्या काळात आपले मनोबल वाढवू शकतो; मात्र या नामजपात सातत्य असणे आवश्यक आहे. याचसमवेत मन स्थिर ठेवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत मनाला स्वयंसूचना दिल्याने मन स्थिर रहाण्यास साहाय्य होते, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

‘नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी योगासने, प्राणायम, आयुर्वेदाचे उपचार इत्यादी प्रयत्न समाजातून होत आहेत. त्याबरोबर रोगप्रतिकारकशक्तीला पूरक असलेले आत्मबळवाढण्यासाठी साधनाच करावी लागते.

परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !

साधकांना ‘पुढे येणार्‍या आपत्काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण कसे होणार ?’, अशासारख्या अनेक गोष्टींची काळजी असते. त्या वेळी साधक हे विसरतात की, ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, तोच आपले रक्षण करणार आहे. आपण केवळ भगवंताच्या अनुसंधानात राहून भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.

जनहो, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल’, अशी घातक मानसिकता पालटा आणि जीवनाचे सार्थक करण्यासाठी साधनेला आरंभ करा !

साधकांनी आपत्काळाच्या सिद्धतेविषयी समाजातील व्यक्तींना सांगितल्यास सर्वांचे जे होईल, तेच आमचेही होईल, असे ते सांगतात. साधकांनी त्यांच्या नातेवाइकांना याविषयी सांगितल्यावर ‘तेही असेच उत्तर देतात’, असे लक्षात आले. तेव्हा मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा आज  वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सांगितलेला त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.