सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना आपत्काळात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ३ रुग्णवाहिकांची आवश्यकता !

आपत्कालीन स्थितीचा विचार करता सनातनच्या विविध आश्रमांसाठी ३ रुग्णवाहिकांची तातडीने आवश्यकता आहे. वैद्यकीय सुविधा आणि अन्य तांत्रिक गोष्टी यांचा विचार करता ‘फोर्स’ (FORCE) या आस्थापनाच्या ‘बेसिक लाईफ सपोर्ट टाईप सी’ (Basic Life Support Type C) या ३ रुग्णवाहिकांची खरेदी करावयाची आहे.

शासकीय नोकरी प्रामाणिकपणे करणारे पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे यांचा साधनाप्रवास !

माझा जन्म ६.१२.१९४३ या दिवशी मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या आजोळी कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे झाला. मी माझे २ धाकटे भाऊ, २ धाकट्या बहिणी आणि विधवा आत्या यांच्यासह पुण्यातील नारायण पेठेत भाड्याच्या जुन्या घरात राहून शिक्षण घेत होतो.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

तालुक्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. नदीकाठच्या गावांतील १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस, केळी, मका, हिरवा चारा आदी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन पडीक होण्याचा मोठा धोका आहे.

शांत, नम्र, आनंदी आणि उतारवयातही तळमळीने, तसेच सेवाभावी वृत्तीने सेवा करणारे पुणे येथील सनातनचे १११ वे संत पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत.

कष्टाळू, कठीण परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या, तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी !

‘आईला अनेक वर्षांपासून निद्रानाशाचा विकार आहे, तरी ती दिवसभर उत्साही असते. आईची २ वेळा ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करावी लागली. त्यामुळे तिचे जेवण आणि हालचाली यांवर पुष्कळ बंधने आली आहेत, तरी ती सतत आनंदी असते.

रात्रभर ५ फूट पुराच्या पाण्यात वहात असलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीता’ ग्रंथाची सर्व पाने कोरडी

रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावनामुळे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील श्री. गोरक्ष कारकिले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले, तसेच त्यांच्या पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे; मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरामध्ये नियमित पूजन करण्यात येणारा ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ ५ फूट पुराच्या पाण्यात रात्रभर वहात असूनही त्याचे एकही पान ओले झाले नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सतत अनुसंधानात रहाणारे पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी आणि पू. गजानन साठे ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

२९ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला ‘ऑनलाईन’ कृष्णानंद सोहळा पार पडला. या सोहळ्यात सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी श्रीमती उषा कुलकर्णी आणि श्री. गजानन साठे यांना संत घोषित करून सर्व साधकांना भावानंद दिला. ‘पुण्यनगरीला (पुणे) लाभलेल्या संतरत्नांच्या गुणांमधून कसे शिकायला हवे ?,’ याविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांना ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन केले.

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

पुणे येथे श्रीमती उषा कुलकर्णी (वय ७९ वर्षे) या सनातनच्या ११० व्या संत, तसेच श्री. गजानन साठे (वय ७८ वर्षे) हे १११ वे संत घोषित !

वयस्कर असूनआजारपणात एकट्याने सर्व परिस्थिती हाताळणार्‍या, ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा अखंड भाव असणार्‍या, तसेच स्थिरताही  हा स्थायीभाव असलेल्या श्रीमती उषा कुलकर्णी यांना सनातनच्या ११० व्या व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले. यासमवेत शांत, नम्र स्वभाव आणि अल्प अहं असलेले अन् शस्त्रकर्म होतांना ईश्वराशी अखंड अनुसंधानात असणारे श्री. गजानन साठे हे १११ वे व्यष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ‘ऑनलाईन’ प्रवचने

२५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.