मान्यवरांना राखी बांधण्याचा सनातन संस्थेचा उपक्रम !


मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या अंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, गुजराती वृत्तपत्र ‘जन्मभूमी’चे संपादक श्री. कुंदन व्यास, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘स्कॉड १८ केबल’चे श्री. वसंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली.
डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...