मान्यवरांना राखी बांधण्याचा सनातन संस्थेचा उपक्रम !


मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या अंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, गुजराती वृत्तपत्र ‘जन्मभूमी’चे संपादक श्री. कुंदन व्यास, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘स्कॉड १८ केबल’चे श्री. वसंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली.
डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !