मान्यवरांना राखी बांधण्याचा सनातन संस्थेचा उपक्रम !


मुंबई – सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. या अंतर्गत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार कॅप्टन आर्. तमिल सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस, गुजराती वृत्तपत्र ‘जन्मभूमी’चे संपादक श्री. कुंदन व्यास, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ‘स्कॉड १८ केबल’चे श्री. वसंत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांना राखी बांधण्यात आली.
डोंबिवली येथे सनातन संस्थेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. राजेश मोरे यांना श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली.
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !