
पनवेल – तत्त्वनिष्ठता, आज्ञापालन, स्थिरता, नम्रता, अंतर्मुखता, समर्पणभावाने सेवा करणे आदी अनेक गुणरत्नांचा खजिना असणार्या मूळच्या तिवरे (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) येथील आणि सध्या सनातनच्या देवद आश्रमात वास्तव्य करणार्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) ६ मार्च या दिवशी सनातनच्या ११८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या. सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केली. अनेक दिवस साधक या क्षणाची उत्कंठतेने वाट पहात असल्याने सर्वांनाच आनंद झाला आणि गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले) कृतज्ञता व्यक्त झाली !
प्रत्येक सेवा दायित्वाने सांभाळणार्या सुश्री (कु.) रत्नमाला दळवी यांचा सन्मान पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी भेटवस्तू देऊन केला. या भावसोहळ्याला देवद आश्रमातील सद्गुरु, संत आणि साधक उपस्थित होते. या भावसोहळ्यात पू. (सुश्री) रत्नमाला दळवी यांचे नातेवाईक ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय...
उत्साही, साधनेची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्या देवद (पनवेल ) येथील पू. (श्रीमती) सुलभा...
सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या...
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.)...
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्या सनातनच्या १३० व्या संत उजिरे,...
सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत...