मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळ्‍यावर किंवा शरिरावर
हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्‍यामागील कार्यकारणभाव

कु. मधुरा भोसले

‘मनुष्‍य जीवनात प्रारब्‍धाचे भोग भोगत असतो. जेव्‍हा त्‍याचे प्रारब्‍धभोग भोगून संपतात, तेव्‍हा त्‍याचा मृत्‍यू होतो. प्रारब्‍धाचे भोग भोगण्‍यासाठी व्‍यक्‍तीला ऊर्जेची आवश्‍यकता असते. जर सात्त्विक जीव साधक साधना करत असेल, तर प्रारब्‍धाचे भोग भोगण्‍यासाठी त्‍याची साधना व्‍यय होत असते. जेव्‍हा सात्त्विक जिवांचा मृत्‍यू होतो, तेव्‍हा प्रारब्‍धभोग भोगण्‍यासाठी व्‍यय होणारे त्‍यांच्‍यातील चैतन्‍य वाचते. पिवळा रंग हा चैतन्‍याचे प्रतीक आहे. सात्त्विक जिवांच्‍या मृत्‍यूनंतर वातावरणातील काही अघोरी वाईट शक्‍ती तंत्रविद्येच्‍या साहाय्‍याने सात्त्विक जिवांचा स्‍थूल देह आणि लिंगदेह यांच्‍यावर नियंत्रण मिळवण्‍याचा प्रयत्न करतात. सात्त्विक जिवाच्‍या पार्थिव देहाचे आणि त्‍याच्‍या लिंगदेहाचे वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्‍य तेजतत्त्वाच्‍या स्‍तरावर त्‍याच्‍या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्‍यावर पसरून देहाभोवती चैतन्‍यदायी संरक्षककवच निर्माण होते. त्‍यामुळे मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळ्‍यावर किंवा शरिरावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसते. हे चैतन्‍य सगुण-निर्गुण स्‍तरावरील असल्‍यामुळे ते दृश्‍य स्‍वरूपात पिवळसर रंगाच्‍या रूपाने दिसते. साधारण ६० टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या पुढील व्‍यक्‍तींचा जेव्‍हा मृत्‍यू होतो, तेव्‍हा त्‍यांचा तोंडवळा किंवा संपूर्ण पार्थिव देह यांच्‍यावर पिवळसर रंगाची छटा पसरलेली दिसते.’

 

मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळ्‍यावर स्‍मित (मंद) हास्‍य दिसण्‍यामागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

‘जन्‍म आणि मृत्‍यू हे स्‍थुलदेहाशी संबंधित असून या दोन्‍ही अवस्‍था चिरकाल टिकणार्‍या नाहीत. ‘ज्‍याचा जन्‍म होतो, त्‍याचा कधी ना कधी मृत्‍यू निश्‍चितपणेच होतो’, हे सत्‍य साधना करणार्‍या जिवांच्‍या अंतर्मनावर बिंबलेले असते. केवळ साधना आणि भगवंताची कृपा हे आपल्‍या समवेत मृत्‍यूनंतरही येतात. त्‍यामुळे साधक मृत्‍यूचे भय न बाळगता भगवंतावर श्रद्धा ठेवून साधनारत असतो. त्‍यामुळे जेव्‍हा साधकाचा मृत्‍यू होतो, तेव्‍हा तो भगवंतावर श्रद्धा ठेवून हसतमुखाने मृत्‍यूला सामोरे जातो. आयुष्‍यभर केलेल्‍या साधनेमुळे साधकाच्‍या चित्तावर साधनेचा दृढ संस्‍कार झालेला असतो. त्‍याच्‍या आंतरिक साधनेमुळे तो मृत्‍यूलाही ईश्‍वरेच्‍छा मानून सहजतेने स्‍वीकारतो. साधक त्‍याच्‍या मृत्‍यूसमयीही भगवंताच्‍या अखंड अनुसंधानात राहिल्‍यामुळे तो स्‍वत:च्‍या मृत्‍यूसमयीही आनंदच अनुभवत असतो. त्‍यामुळे जेव्‍हा काही जण आनंदाने मृत्‍यूला सामोरे जात असतात, तेव्‍हा त्‍यांच्‍या मनातील आनंद त्‍यांच्‍या तोंडवळ्‍यावरील स्‍मितहास्‍याच्‍या रूपाने व्‍यक्‍त होतो. त्‍यामुळे मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळ्‍यावर स्‍मित (मंद) हास्‍य दिसते. त्‍यामुळे साधकाच्‍या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेणार्‍या साधकांनाही पार्थिव देहाला पाहून आनंदाची अनुभूती येते.

अशा प्रकारे मृत्‍यूनंतर काही जणांच्‍या तोंडवळा किंवा शरीर यांच्‍यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसणे आणि किंवा काही जणांच्‍या तोंडवळ्‍यावर स्‍मित (मंद) हास्‍य दिसणे, या दोन्‍ही घटनांतून मृत व्‍यक्‍तीचा लिंगदेह सात्त्विक आणि चैतन्‍यदायी असल्‍याची दैवी प्रचीती मिळते.’

 

मृत्‍यूनंतर पार्थिवावर पिवळसर रंगाची छटा येणे
आणि तोंडवळ्‍यावर स्‍मितहास्‍य दिसणे यांच्‍यातील भेद


तात्‍पर्य

यावरून ‘आयुष्‍यभर साधना केल्‍यामुळे जीवनाच्‍या शेवटी मृत्‍यूसारखी घटनाही किती आनंददायी असू शकते आणि वर्तमानकाळात राहून मनापासून आणि भावपूर्ण साधना करणे किती महत्त्वाचे आहे’, हे आपल्‍या लक्षात येते.

कृतज्ञता

भगवंताच्‍या कृपेमुळे ‘मृत्‍यूच्‍या वेळी देहाशी संबंधित दैवी प्रचीती मिळण्‍यामागील आध्‍यात्मिक कार्यकारणभाव लक्षात आला’, यासाठी भगवंताच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञता !

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment