आषाढ पौर्णिमा अर्थात ‘गुरुपौर्णिमा’ : २३ जुलै २०२१
‘२३ जुलै २०२१ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस शिष्यासाठी अविस्मरणीय असतो. या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा आणि धनाचा त्याग करणार्याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.
१. शिष्याच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व !
निर्गुण परमेश्वराचे पृथ्वीतलावर कार्यरत असणारे सगुण रूप म्हणजेच गुरु ! गुरु शिष्याला ज्ञान देऊन त्याची पारमार्थिक उन्नती होण्यासाठी अखंड झटत असतात. त्यामुळे शिष्याला गुरूंविना तरणोपाय नसतो. शिष्याने गुरूंना सर्वस्व अर्पून त्यांची सेवा करणे, हीच खरी गुरुदक्षिणा असते. त्यामुळे शिष्यावर गुरुकृपेचा ओघ अखंड रहातो.
२. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकार्यासाठी, म्हणजेच धर्मकार्यासाठी धन अर्पण करा !
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्यामुळे जिज्ञासू, तसेच हितचिंतक यांनी धर्मप्रसाराचे कार्य करणे आणि त्यासाठी धन अर्पण करणे, यांद्वारे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा.
सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे’, हे सर्वश्रेष्ठ अर्पण आहे. त्यामुळे धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांच्या कार्यासाठी धनदान करणे, हे काळानुसार आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्था हे कार्य अत्यंत निस्वार्थीपणे करत आहे. त्यामुळे अर्पणदात्यांनी सनातन संस्थेला केलेल्या अर्पणाचा विनियोग निश्चितच धर्मकार्यासाठीच होणार आहे.
अर्पण करण्यास इच्छुक असलेल्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर किंवा सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क साधावा.गुरुपौर्णिमेसाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ अर्पण https://www.sanatan.org/en/donate करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. |


अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !