मुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर आणि अधिकारी यांना सिद्धतेचे आदेश

मुंबई – शासनाने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या १-२ मासांत राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती कोरोनाविषयी राज्यशासनाने नियुक्त केलेल्या ‘टास्क फोर्स’ ने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पालटलेल्या ‘डेल्टा प्लस’ या विषाणूमुळे ही लाट येण्याची शक्यता ‘टास्क फोर्स’ ने व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १७ जून या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ‘टास्क फोर्स’ कडून ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात कोरोनाच्या पहिल्या लाटेत १९ लाख, तर दुसर्या लाटेत ४० लाख रुग्णांची नोंद आहे. तिसर्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत जाऊ शकते. यामध्ये १० टक्के मुलांचा समावेश असू शकतो, अशी शक्यता ‘टास्क फोर्स’ च्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ‘टास्क फोर्स’ ने वर्तवलेल्या धोक्यावरून उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर आणि अधिकारी यांना औषध अन् आरोग्य उपकरणे सिद्ध ठेवण्याचे, तसेच ग्रामीण भागात औषधे आणि आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !