
‘पुणे विद्यापिठाच्या सभागृहात राजीव गांधी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या या परिसंवादाला महाराष्ट्र्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर उपस्थित होते. ‘२१ व्या शतकातील भारतीय समाजाची रचना कोणत्या मूल्यांवर आधारित असावी ?’, असा मोठा गहन विषय परिसंवादासाठी निवडण्यात आला होता. राज्यपाल महोदयांनी ३ मूल्यांच्या आधारे आपला विषय मांडला. त्यातील पहिले सूत्र होते,
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥
अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.
दुसरे सूत्र ‘‘वसुधैव कुटुम्बकम्’’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) आणि तिसरे सूत्र म्हणजे ‘‘एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति’’ (‘ब्रह्म’ हे एकच सत्य नाम आहे आणि वेदज्ञ त्याला विविध नावांने ओळखतात)
या वेळी उपस्थित विद्वान मंडळींचे तोंडवळे पहाण्यासारखे झाले होते. ‘हिंदु धर्माच्या तत्त्वाप्रमाणे जीवनपद्धती आचरली, तर चिरंतन स्थैर्य मिळेल’, असाच संदेश राज्यपाल महोदयांच्या भाषणातून व्यक्त झाला.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !