
तासगाव (जिल्हा सांगली) – जीवनात साधना अत्यंत महत्त्वाची असून आयुष्यभर केलेल्या योग्य साधनेमुळे मनुष्य सतत आनंदी राहू शकतो. मुनष्य जीवनात येणार्या सुख-दु:खावर मात करण्यासाठी साधनाच उपयोगी पडते, किंबहुना साधना हेच जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर आहे. तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. गेल्या काही मासांपासून जे धर्मप्रेमी नियमित साधना करत आहेत, त्यांच्यासाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.
या मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील अनेक जिज्ञासूंची उपस्थिती होती. या वेळी अनेक धर्मप्रेमींनी साधनेमुळे त्यांच्या आयुष्यात कशा प्रकारे पालट झाले ? नामजपाने आणि योग्य साधनेमुळे झालेले लाभ विशद् केले. अनेक धर्मप्रेमींनी साधना चालू केल्यावर मन शांत झाले, राग अल्प झाला, घरातील वाद-विवाद अल्प झाले यांसह झालेले अन्य पालट सांगितले. या कार्यक्रमात धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !