सिंधुदुर्ग – चक्रीवादळ, पूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती, तर कोरोनासारखे मानवनिर्मित संकट यांमुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. यासह रस्त्यांवरील अपघात, आकस्मिक दुर्घटना घडत असतात. यांमध्ये होणारे बहुतांश मृत्यू रुग्णाला वेळीच प्रथमोपचार न मिळाल्याने होतात. सध्याच्या काळात वाढती गुन्हेगारी, हिंसाचार, दंगली, अपघात, आतंकवाद पहाता आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि समाजबांधव यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रथमोपचार प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेतून प्रथमोपचाराच्या विविध पद्धती शिकूया आणि इतरांनाही शिकवूया, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ सप्टेंबरला या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याचा १८० धर्मप्रेमींनी लाभ घेतला.
या वेळी सौ. नारकर म्हणाल्या, ‘‘इंग्लंडने दुसर्या महायुद्धाच्या काळात देशातील नागरिकांनो ठिकठिकाणी सोप्या शब्दांत माहिती दिली होती. प्रथमोपचाराची विशेष पथके उभारली होती. त्यामुळे वेळीच झालेल्या प्रथमोपचारांमुळे सैनिकांना पुन्हा युद्धसज्ज होता आले. सध्या जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळी आपण प्रथमोपचार शिकून घेतल्यास येत्या युद्धकाळात आपणाला राष्ट्रकार्यात योगदान देता येईल.’’

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !