‘१३.९.२०२० या दिवशी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनंतर शुक्र ग्रह वगळता रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शनि, राहू आणि केतू हे आठ ग्रह त्यांच्या स्वराशीत किंवा उच्च राशीत आहेत. यासाठी सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनंतर देवतांची उपासना करणे लाभदायक आहे’, असा संदेश सर्वत्र पाठवला जात होता. यासंदर्भात ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
१. सर्व ग्रह शुभ फळ देण्याचा काळ एकाच दिवशी नसणे
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह शुभ अथवा अशुभ असल्यावर त्याचे फळ देण्याचा काळ ठरलेला असतो. १३.९.२०२० या दिवशी रवि, चंद्र, मंगळ, गुरु आणि शनि हे पाच ग्रह त्यांच्या स्वराशीत आहेत. बुध, राहू आणि केतू हे ग्रह उच्च राशीत आहेत; परंतु असे असले, तरीही सर्व ग्रह शुभ फळ देण्याचा काळ एकाच दिवशी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा ग्रह सर्वकाळ फळ देतो; परंतु इतर ग्रहांचा फळ देण्याचा कालावधी निराळा आहे.
२. रवि ग्रहाची स्थिती

रवि ग्रह एका राशीत १ मास असतो. हा ग्रह यातील पहिले पाच दिवस फळ देतो; परंतु १३.९.२०२० या दिवशी तसे नव्हते. १३.९.२०२० या दिवशी रवि ग्रह सिंह राशीत साडेसव्वीस अंशावर आहे. १६.९.२०२० या दिवशी रवि ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
३. १३.९.२०२० या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजे ‘इंदिरा एकादशी’ आहे. भगवान श्रीविष्णूची उपासना करायला ही तिथी लाभदायक आहे.
४. सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनामार्गानुसार अष्टांग साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
५. केवळ ग्रह शुभ स्थितीत असतांनाच नव्हे, तर सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्यास सर्वथा लाभ होतो.’
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !