श्रीरामभक्त, देशभक्त आणि धर्मप्रेमी यांना आवाहन !
‘प्रभु श्रीरामाच्या कृपेने ५ ऑगस्ट या दिवशी अयोध्येत श्रीराममंदिराचे भूमीपूजन होणार आहे. श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा हा क्षण आहे. या दिवशी सर्वांनी पुढील प्रकारे हा कृतज्ञता उत्सव साजरा करून प्रभु श्रीरामाची कृपा संपादन करूया.

अ. कोरोनाच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शक्य असल्यास आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवावा.
आ. सकाळी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यापुढे तेलाचा दिवा लावावा.
इ. सायंकाळी घरापुढे तेलाचे दोन दिवे लावून रामरक्षा पठण करावे.
ई. घरापुढे रामतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी काढावी. (रांगोळी येथे दिली आहे. )

उ. दिवसभरात कुटुंबातील सदस्यांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप अधिकाधिक करावा. (या जपाचा ऑडिओ https://www.sanatan.org/mr/chant-shriram या लिंकवर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ या अॅपवर उपलब्ध आहे.)
ऊ. प्रभु श्रीरामाला अपेक्षित असे रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र लवकर अवतरण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करावी.
ए. व्हॉट्सअॅप, फेसबूक आदी सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा ‘डीपी’ (डिस्प्ले पिक्चर) ठेवून अधिकाधिक श्रीरामभक्तांना असे करण्याचे आवाहन करावे.’

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...