जबलपूर येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’चा स्तुत्य उपक्रम !

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’द्वारे प्रतिवर्षी वारी सोहळा अत्यंत चांगल्या रितीने साजरा होतो. सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे वारी सोहळा संभव नसल्याने ‘ओळख संतांची..’, या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवन चरित्र आणि अलौकिक कार्य’, या विषयावर २२ जून या दिवशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी यासंबंधी विचार व्यक्त केले.
त्यासह श्री. राजहंस यांनी श्री विठ्ठल, वारी यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेले शास्त्रीय ज्ञान ही उपस्थितांना अवगत केले. अनेक दर्शकांनाही हा कार्यक्रम अतिशय भावला. आषाढी कार्तिकी वारीच्या ‘फेसबूक ग्रुप’वर अनेकांनी स्वतःचा प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे संयोजक श्री. संतोष गोडबोले यांचे सहकार्य लाभले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !