जबलपूर येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’चा स्तुत्य उपक्रम !

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील ‘आषाढी कार्तिकी वारी महामंडळा’द्वारे प्रतिवर्षी वारी सोहळा अत्यंत चांगल्या रितीने साजरा होतो. सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीमुळे वारी सोहळा संभव नसल्याने ‘ओळख संतांची..’, या विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन केले. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जीवन चरित्र आणि अलौकिक कार्य’, या विषयावर २२ जून या दिवशी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी यासंबंधी विचार व्यक्त केले.
त्यासह श्री. राजहंस यांनी श्री विठ्ठल, वारी यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मांडलेले शास्त्रीय ज्ञान ही उपस्थितांना अवगत केले. अनेक दर्शकांनाही हा कार्यक्रम अतिशय भावला. आषाढी कार्तिकी वारीच्या ‘फेसबूक ग्रुप’वर अनेकांनी स्वतःचा प्रतिसाद नोंदवला. या कार्यक्रमासाठी आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे संयोजक श्री. संतोष गोडबोले यांचे सहकार्य लाभले.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...