सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उद्योजकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

मुंबई, ठाणे, रायगडसह गुजरात येथील उद्योजकांचा सहभाग

मुंबई – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१ मे या दिवशी ‘ऑनलाईन कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या संकटकाळात आध्यात्मिक बळ असण्याचे महत्त्व काय ?, ते कसे वाढवावे ?, व्यावसायिक जीवनात साधना करून आनंद कसा मिळवू शकतो ?, साधनेचे महत्त्व काय ?, यांविषयी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी, तर मंदिरांचे महत्त्व, मंदिरांची सद्य:स्थिती आणि सरकारची नीती या सूत्रांवर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात उद्योग करत असतांना राष्ट्र-धर्म कार्यात प्रत्यक्ष कृतीद्वारे कसे योगदान देऊ शकतो ?, याविषयी समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी सांगितले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ३३ उद्योजक सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment