७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी यांचा देहत्याग

देवी माताच जीवंत ठेवत असल्याची योगी प्रल्हाद जानी यांची होती श्रद्धा !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

कर्णावती (गुजरात) – गेली ७६ वर्षे अन्न आणि पाणी ग्रहण न करणारे योगी प्रल्हाद जानी उपाख्य चुनरीवाला माताजी यांनी २६ मे या दिवशी गांधीनगर येथे देहत्याग केला. ते ९० वर्षांचे होते. १४ वर्षांचे असतांना त्यांनी अन्न आणि पाणी यांचा त्याग केला होता. वर्ष २०१० मध्ये ‘डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ फिजियोलोजी अँड अलाईड सायन्सेस’च्या डॉक्टरांच्या पथकाने १५ दिवस त्यांची तपासणी केली होती.

योगी प्रल्हाद जानी यांनी म्हटले होते की, ‘मला अन्न आणि पाणी यांची आवश्यकता भासत नाही; कारण देवी मातेनेच मला जिवंत ठेवले आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment