सोलापूर – सध्याच्या आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. सध्याची स्थिती पहाता आपत्काळाला प्रारंभ झाला असून पुढील २ वर्षे आणखी कठीण काळ असणार आहे. भगवंताने साधना करण्यासाठी आपल्याला जन्माला घातले आहे. त्यामुळे भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधना करा. शाळा आणि महाविद्यालये कधी चालू होतील ?, हे ठाऊक नाही. घरात पैसे आहेत; पण दळणवळण बंदीमुळे त्याच्या वापरावरही निर्बंध आले आहेत. त्यामुळे आता वेळ न दवडता किंवा बुद्धीने कोणताही विचार न करता साधनेला प्रारंभ करून ईश्वराचा भक्त होण्यासाठी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय करा !, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
४ मे या दिवशी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील युवा साधकांची संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून कार्यशाळा घेण्यात आली. त्यात त्या बोलत होत्या. या कार्यशाळेला २५० युवा साधक सहभागी झाले होते.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...