कार्यालयातून घरी गेल्यावर पाळायची सूत्रे
१. कार्यालय सोडण्याआधी घरी दूरध्वनी करून कळवा.
२. घरातील कुणीतरी समोरचा दरवाजा उघडा ठेवावा, जेणेकरून दारावरची घंटा अथवा दाराचे हँडल यांना हात लावण्याची घरातून बाहेर गेलेल्या संबंधित सदस्याला आवश्यकता भासू नये. तसेच दाराबाहेर एक बालदी पाणी आणि धुण्याच्या साबणाची पूड अथवा ब्लिचिंग पावडर हे साहित्य ठेवलेले असावे.
३. स्वतःजवळील वाहनाच्या चाव्या, पेन, सॅनिटायझर बाटली, दूरध्वनी उपकरण इत्यादी साहित्य दाराबाहेर ठेवलेल्या एका डब्यात टाकावे.
४. बालदीतील पाण्यात हात धुवावे आणि त्या पाण्यात थोडा वेळ उभे राहावे. या कालावधीत टिशू पेपर आणि सॅनिटायझरने डब्यात ठेवलेले साहित्य पुसून काढावे.
५. परत एकदा स्वतःचे हात साबणाच्या पावडरने धुवावे.
६. नंतर घरातील कुठल्याही वस्तूला स्पर्श न करता घरात प्रवेश करावा.
७. घरातील कुणीतरी स्वच्छतागृहात एका बालदीत डिटर्जंट पावडर टाकलेले पाणी ठेवावे आणि स्वच्छतागृहाचे दार उघडेच ठेवलेले असावे. बाहेरून आलेल्या व्यक्तीने स्वतः घातलेल्या अंतर्वस्त्रांंसह सर्व कपडे त्या बालदीत भिजत ठेवावे.
८. नंतर साबण आणि शाम्पू यांचा वापर करून डोक्यावरून स्वच्छ स्नान करावे.
९. स्वतःचे कपडे हाताने अथवा वॉशिंग मशीनमध्ये टाकून गरम पाण्याने धुवावे आणि ते सूर्यप्रकाशात वाळत घालावेत.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...