आपत्काळरूपी तमोगुणी अंधःकारात लखलखले दीपज्योतीचे तेज
मुंबई – अंधकाररूपी कोरोनाच्या लढाईत देशवासियांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणती, मेणबत्ती किंवा विजेरी (टॉर्च) लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. रात्रीच्या अंधारात लक्षावधी दिव्यांमुळे आसमंत उजळून गेला. घराची गच्ची, अंगण, दरवाजा, खिडकी आदी ठिकाणी नागरिकांनी दिवे लावून प्रार्थना केली.

मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली. देशवासीय संघटितपणे तेजाची आराधना करत असल्याने सकारात्मक ऊर्जा वातावरणात अनुभवायला मिळाली. याप्रमाणेच जळगाव, अमरावती येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या बाहेरही दीप लावण्यात आले.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...