आपत्काळरूपी तमोगुणी अंधःकारात लखलखले दीपज्योतीचे तेज
मुंबई – अंधकाररूपी कोरोनाच्या लढाईत देशवासियांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी, यासाठी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणती, मेणबत्ती किंवा विजेरी (टॉर्च) लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याला सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. रात्रीच्या अंधारात लक्षावधी दिव्यांमुळे आसमंत उजळून गेला. घराची गच्ची, अंगण, दरवाजा, खिडकी आदी ठिकाणी नागरिकांनी दिवे लावून प्रार्थना केली.

मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली. देशवासीय संघटितपणे तेजाची आराधना करत असल्याने सकारात्मक ऊर्जा वातावरणात अनुभवायला मिळाली. याप्रमाणेच जळगाव, अमरावती येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या बाहेरही दीप लावण्यात आले.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !