मुंबई – मोगलाईत मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होते. हे सर्व थांबण्यासाठी मोगल साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न माता जिजाऊंनी पाहिले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाल शिवबावर ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वृद्धींगत होईल, असे संस्कार केले. पुढे छत्रपती शिवरायांनी मावळ्यांसह प्रयत्नांची पराकाष्ठा करून हिंदवी स्वराज्य निर्माण करून जनतेला अन्यायापासून मुक्त केले. आजच्या परिस्थितीतही हिंदु धर्म, मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांवर आघात होत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना. ते सत्यात उतरवण्यासाठी आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. चेंबूर येथील संत गाडगे महाराज सेवा सोसायटी येथे शिवजयंती उत्सवात सौ. नयना भगत बोलत होत्या. या वेळी वसाहतीतील लहान-थोर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Home > सनातन वृत्तविशेष > समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था
समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन गौरवदिंडी
- देहली येथे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांची सनातनच्या धर्मप्रचारकांनी घेतली सदिच्छा भेट !
- साधकांनो, आपोआप होत असलेला नामजप न करता आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी उपाय म्हणून सांगितलेला नामजप...
- सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी...
- भाग्यनगर (तेलंगाणा) येथे जागतिक अध्यात्म महोत्सवाला प्रारंभ; सनातन संस्था सहभागी !
- सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !