गुरुतत्त्व हे श्रेष्ठ तत्त्व असून जिज्ञासू शिष्य झाल्यावर गुरु सदेह
त्याच्या जीवनात येतात ! – नागेश गाडे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके

रामनाथी (गोवा) – प्रारब्ध भोगणे आणि ईश्वरप्राप्ती करणे, या हेतूंसाठी मनुष्याचा जन्म होतो. जिवाच्या अनेक जन्मांतील कर्मांनुसार त्याच्या पाप-पुण्याचा होणारा संचय म्हणजे संचित होय. जन्माच्या वेळी यातील काही भाग प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी येतो. प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते. ईश्वरप्राप्तीसाठी जीवनात गुरूंची आवश्यकता असते. गुरुतत्त्व हे श्रेष्ठ तत्त्व असून जिज्ञासू शिष्य झाल्यावर गुरु सदेह त्याच्या जीवनात येतात, असे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी केले. येथील सनातनच्या आश्रमात ३१ जानेवारीला ‘साधना शिबिरा’चा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. सनातन संस्थेचे जिज्ञासू आणि हितचिंतक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. हे शिबिर २ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !