पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेतील सूर

मुंबई – शाळेत प्रवेश मिळण्यापासूनच लहान मुलांमध्ये चढाओढीला आरंभ होतो. त्यानंतर विविध शिकवण्या, इतर विद्यार्थ्यांकडून होणारी चेष्टा, पालकांचे आपापसांतील वाद, त्यांचा घटस्फोट इत्यादी कारणांमुळे मुलांवर ताण येतो. तो हाताळण्यासाठी मुलांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवणे आवश्यक आहे. म्हणूनच शालेय शिक्षणामध्ये मानसिक आरोग्याला महत्त्व प्राप्त व्हावे, असा सूर मानसिक आरोग्य परिषदेत उमटला. ‘आदित्य बिर्ला एज्यूकेशन ट्रस्ट’ने आयोजित केलेल्या ‘बी द चेंज’ या पहिल्या मानसिक आरोग्य परिषदेत पालक-शिक्षक, मानसोपचारतज्ञ सहभागी झाले होते. ‘बौद्धिक विकासापेक्षा मुलांच्या भावनिक विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे’, असे आदित्य बिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका सिन्हा म्हणाल्या.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !