
जळगाव – दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक मनुष्याची धडपड, ही आनंद मिळावा म्हणून असते. हा आनंद केवळ साधनेनेच मिळू शकतो. साधना केल्याने जीवनात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते; म्हणून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते कोरपावली येथील श्री स्वामीनारायण मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात बोलत होते.
सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी ?, स्वभावातील दोष दूर करून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’ अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ ९५ जिज्ञासूंनी घेतला.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...