देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेची आवश्यकता ! – महंत रामजनमदास शास्त्री महाराज, जम्मू-काश्मीर

चर्चा करतांना डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ आणि महंत रामजनमदास शास्त्री महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – सध्या आपला देश बाह्य आणि अंतर्गत शत्रूंमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी राष्ट्रकार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या संस्थेची अतिशय आवश्यकता आहे. हिंदु जनजागृती समितीसुद्धा जेे कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीर येथील महंत रामजनमदास शास्त्री महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवटही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment