जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण पैलू !

१. श्रीकृष्णाचे कुटुंबीय

अ. श्रीकृष्णाच्या जन्मदात्या पित्याचे नाव वसुदेव होते. त्यांना ‘यादव’ असे संबोधले जात होते.

आ. वसुदेवाने श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर त्याला गोकुळात नंदाकडे पोहोचवले आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला त्याने मथुरेत आणले.

 

२. राधा

श्रीकृष्णाच्या राधेचा उल्लेख महाभारत, हरिवंशपुराण, विष्णुपुराण आणि भागवतपुराण यांत नाही. ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची भक्त होती.

 

३. शिक्षण आणि साधना

अ. श्रीकृष्णाने औपचारिक शिक्षण काही मासांतच (महिन्यांतच) पूर्ण केले.

आ. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

 

४. श्रीकृष्णाने वसवलेल्या नगरी

श्रीकृष्णाने २ नगरींची स्थापना केली होती – स्वतः द्वारका आणि पांडवांद्वारे इंद्रप्रस्थ

 

५. श्रीकृष्णाची आयुधे

अ. श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव ‘शारंग’ आणि मुख्य आयुध चक्राचे नाव ‘सुदर्शन’ होते. त्याच्या योग्यतेची केवळ २ विध्वंसक अस्त्रे होती – पाशुपतास्त्र (शिव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे होते.) आणि प्रस्वपास्त्र. (शिव, वसुगण, भीष्म आणि श्रीकृष्ण यांच्याकडे होते.)

आ. कृष्णाच्या खड्गाचे नाव ‘नंदक’, गदेचे नाव ‘कौमौदकी’ आणि शंखाचे नाव ‘पांचजन्य’ होते.

 

६. सर्वश्रेष्ठ धनुर्धर

‘अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होेता’, असे मानले जाते; परंतु वास्तवात श्रीकृष्ण या विद्येत सर्वश्रेष्ठ होता आणि ते सिद्धही झाले होते. मद्र राजकुमारी लक्ष्मणा हिच्या स्वयंवरातील पण द्रौपदीच्या स्वयंवरातील पणापेक्षाही कठीण होता. त्या वेळी कर्ण आणि अर्जुन दोघेही अयशस्वी झाले होते. तेव्हा श्रीकृष्णाने लक्ष्यवेध करून लक्ष्मणा हिची इच्छा पूर्ण केली. लक्ष्मणानेही श्रीकृष्णाला आधीच पती मानले होते.

 

७. श्रीकृष्णाने केलेली युद्धे

अ. श्रीकृष्णाने अनेक मोहिमा आणि युद्ध यांचे संचालन केले; परंतु त्यांतील ३ सर्वाधिक भयंकर युद्धे होती – महाभारत, जरासंध आणि कालयवन यांच्या विरुद्ध, तसेच नरकासुराच्या विरुद्ध

 

८. श्रीकृष्णाने केलेला राक्षसांचा वध

अ. श्रीकृष्ण १६ वर्षांचा असतांना त्याने विश्‍वप्रसिद्ध चाणूर आणि मुष्टीक यांसारख्या मल्लांचा वध केला.

आ. श्रीकृष्णाने आसाममध्ये बाणासुराशी युद्ध केले.

 

९. श्रीकृष्णाचे शेवटचे दिवस

अ. शेवटची वर्षे सोडल्यास श्रीकृष्ण द्वारकेत ६ मासांहून (महिन्यांपेक्षा) अधिक काळ कधीच राहिला नाही.

आ. श्रीकृष्णाच्या परमधामगमनाच्या वेळी त्याचा एकही केस पांढरा झाला नव्हता, तसेच त्याच्या देहाला एकही सुरकुती नव्हती.

इ. श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ आणि त्याचे वय यांविषयी पुराणे आणि आधुनिक संशोधक यांत मतभेद आहेत. काही जण त्याचे आयुष्य १२५ वर्षे, तर काही जण ११० वर्षे असल्याचे सांगतात.

 

१०. श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेच्या रूपात आध्यात्मिकतेची वैज्ञानिक व्याख्या सर्वांसमोर ठेवली आहे. ती मानवतेसाठी सर्वांत मोठा संदेश आहे.’

(संदर्भ : संकेतस्थळ)

Leave a Comment