
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास फोफावलेल्या ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल. यासाठी मंदिरातून धर्मशिक्षण फलक लावणे, नामजप लावणे, सामूहिक आरतीसाठी हिंदूंनी एकत्रित येणे, बालसंस्कारवर्ग चालू करणे, युवकांसाठी धर्मप्रशिक्षणवर्ग चालू करणे, असे उपक्रम प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या ‘कुंभार समाज विठ्ठल मंदिर’ येथे मंदिर विश्वस्तांसाठी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुरेखा पाटील यांनी केले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने, सांगली जिल्हा मंदिर समन्वयक श्री. संजय घाटगे, ‘धोंडीराम महाराज मठा’चे श्री. सुभाष पाटील, ‘कुंभार माळी समाज मंडपा’चे गुरव श्री. आनंदा माळी, काशीविश्वेश्वर मंदिराच्या सेविका सौ. दीपा संत्रा, सेवक श्री. मानसिंग पाटील, श्री. सुनील फल्ले, विनायक मंदिराचे सेवक श्री. सोमनाथ गणपती जंगम, काळा मारुति मंदिराचे पुजारी श्री. अमृत दिवाण यांसह अन्य उपस्थित होते.
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला
हिंदु म्हणून संघटित होऊनच आपण खर्या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल करू शकतो ! – सौ. शुभा...