चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

सनातनच्या रामनाथी आश्रमासमोरून जातांना गेली ८ वर्षे काही समाजद्रोही सनातन बॉम्ब, असे ओरडत जातात. काहीजण शिव्या देत जातात, काहीजण दगड फेकतात, तर काहीजण पेट्रोल बॉम्ब फेकतात. विविध संप्रदायांच्या भक्तांना, हिंदुत्ववाद्यांना आणि संतांना येणारे पुढील अनुभव वाचले की, लक्षात येईल की, सनातनविरोधी अशी कृत्ये करणारे असुरांच्या कह्यात आहेत. हिंदु राष्ट्रात त्यांचा नाश केला जाईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.६.२०१५)

उत्तम व्यवस्थापन असलेला उत्तम आश्रम !

     उत्तम व्यवस्थापन असलेला उत्तम आश्रम ! प्रत्येक साधकाच्या प्रत्येक टप्प्यातील आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने पूर्ण नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले. आश्रमात सर्व ठिकाणी चैतन्य पसरलेले आहे. मला येथे रहावे, असे वाटत आहे; परंतु मला परत जायला हवे. मला येथे येण्याची आणि आश्रम पहाण्याची संधी दिलीत; यासाठी मी आपला आभारी आहे. – श्री. आनंद कृष्ण दासा, बेंगळुरू, अध्यक्ष वॉट्स; अध्यक्ष, हरे कृष्ण मंदिर, बेंगळुरू. १७.६.२०१५