गुरुकृपायोगानुसार साधना करून हिंदु राष्ट्राचे साक्षीदार आणि भागीदार होऊया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

प्रत्येक मनुष्यावर पितृ ऋण, गुरुऋण, ऋषिऋण आणि समाजऋण असते. आई-वडिलांची सेवा करून त्यांचे ऋण फेडता येते. ऋषींनी सांगितलेली साधना करून त्यांचे ऋण फेडता येते. गुरूंनी सांगितलेली साधना समाजाला सांगून म्हणजे समष्टी साधना करून समाजऋण आणि गुरुऋण फेडता येते. यासमवेत समष्टी साधनेसह व्यष्टी साधना करणेही आवश्यक आहे.

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित केले होते.

साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

संशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अनमोल ठेवा उपलब्ध करून देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला छायाचित्रणासाठी (‘फोटोग्राफी’साठी) विविध उपकरणे आणि साहित्य यांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ वैज्ञानिक भाषेत आध्यात्मिक संशोधन करण्याचे एकमेवाद्वितीय आणि ऐतिहासिक कार्य करत आहे. या विश्‍वविद्यालयाचे काही साधक संतांच्या मार्गदर्शनानुसार विविध ठिकाणी प्रवास करून भारतीय संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा संग्रह करत आहेत.

धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही.

लशुनादि वटी (गोळ्या)

हे एक उत्तम पाचक औषध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.