
पनवेल – २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा बालसाधकांनी दिल्या. तसेच ‘धर्म की जय हो । अधर्म का नाश हो । प्राणीयोमें सद्भावना हो । विश्व का कल्याण हो ।’ असा जयघोषही करण्यात येत होता. फेरीसाठी बालसाधकांनी स्वतःहून राष्ट्रध्वज, तसेच भगवे झेंडे आणले होते.मुले सामाजिक अंतर पाळून या फेरीत सहभागी झाली होती. येथील स्वयंभू शिवमंदिरापासून फेरीचा आरंभ होऊन संकुलातील परिसरात फेरी झाल्यावर सांगताही या मंदिरापाशी करण्यात आली. फेरीच्या आरंभी राष्ट्रगीत, तर अखेरीस ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...