नवम अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचा सातवा दिवस

राष्ट्रविरोधी प्रवृत्तींचा विरोध अन् ‘सुराज्य अभियान’ याविषयांवर ‘हिंदुराष्ट्र अधिवेशना’त मान्यवरांची भाषणे

लाखो एकर भूमी लुटणार्‍या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

वर्ष 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारनेवक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करून मुसलमानांना अमर्याद अधिकार दिले. या सुधारित कायद्यामुळे कोणत्याही ट्रस्ट वा मंदिर यांची संपत्ती नव्हे, तर कोणतीही संपत्ती वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचा पाशवी अधिकार बोर्डाला मिळाला. त्यामुळेआज भारत शासनाच्या संरक्षण दलआणि रेल्वे विभाग यांच्यानंतरसर्वाधिक (6 लाख एकर) भूमीचा मालकवक्फ बोर्ड आहे. मुळात वक्फकडेइतकी भूमी कधीच नव्हती; मात्र हिंदूंचे या कायद्याविषयी असलेले अज्ञान तथा उदासीनता यांमुळेवक्फ बोर्डाकडून देशभरात लाखो एकर भूमी लुटण्याचा अक्षरश: नंगानाचचालू आहे. बोर्डाचा चालू असलेला ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्हजिहाद’पेक्षाही भयंकर आहे.त्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन कायदेशीर लढा द्यायला हवा, असे आवाहन सर्वोच्चन्यायालयातील अधिवक्ता तथा ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चेअध्यक्ष हरि शंकर जैन यांनी केले. ते हिंदुजनजागृती समिती आयोजित‘ऑनलाईन’ नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मध्येबोलत होते. हे अधिवेशन समितीच्या ‘यू-ट्यूब’ चॅनल आणि ‘फेसबूकपेज’द्वारे ४२६०० हून अधिक जणांनी लोकांनी प्रत्यक्ष पाहिले, तर 1 लाख 60 हजारांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले,‘आपले प्राचीन भारतीय शिक्षण, न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, वैद्यकशास्त्र, वास्तूशास्त्र आदी प्रगत आणि विश्‍वात सर्वोष्कृष्ट आहे. लॉर्ड मेकॉलेनंतर मात्र कम्युनिस्ट विचारांनी ग्रस्त पंडित नेहरूंनी शैक्षणिक धोरणे ठरवण्याचे अधिकार कम्युनिस्टांकडे दिले; परिणामी गेल्या एक हजार वर्षांत मोगल आणि इंग्रज यांनी जेवढी भारताची हानी केली नसेल, तेवढी हानी डाव्या विचार धारेच्या लोकांनी 70 वर्षांत केली आहे.आता डाव्या विचारांच्या टोळ्या भारताचे तुकडे करण्यासाठी सरसावल्या आहेत. या विरोधात हिंदूंनी सत्य इतिहास अन् संस्कृती जाणून घेऊन लढण्यास सज्ज झाले पाहिजे.’रायपूर,छत्तीसगड येथील नवम् पीठाधीशपू. शदाणी दरबार तीर्थचे पू. युधिष्ठीरलालजी महाराज म्हणाले की, आज विश्‍वभरातील हिंदूंनी आपल्याअंतर्मनातील हिंदु राष्ट्रस्थापनेचा विचार व्यक्त करायला हवा. जेणेकरून सर्वत्रचे हिंदु जागृत होतील आणि राष्ट्राच्यास्थापनेसाठी आवाज उठवतील. आपण जेवढ्या लवकर संघटित होऊ,तेवढ्या लवकर हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प पूर्ण होईल. यावेळी ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या समन्वयक अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘अन्नधान्य,दूध, पेट्रोल-डिझेल यांतीलभेसळ; वजन-मापात फसवणूक; शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार; ग्राहक आणि रुग्ण यांची लुटमार आदींनाकारणीभूत सामाजिक दृष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा द्यायला हवा. ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत यांविरोधात आवाज उठवणे, तक्रारीकरणे, न्यायालयात जनहित याचिकाकरणे आदी माध्यमांतून ‘आरोग्यसाहाय्य समिती’ कार्यरत असून यात राष्ट्रप्रेमी जनतेनेही सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

 

‘सुराज्य अभियान राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवर वक्‍त्‍यांचे उद़्‍बोधक विचार !

१. पशूहत्‍येविषयी कठोर शिक्षेची तरतूद असणारे कायदे हवेत ! – अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्‍यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

२. बोकाळलेली भ्रष्‍ट व्‍यवस्‍था पालटण्‍यासाठी सुराज्‍य अभियानात सहभागी व्‍हा ! – अश्‍विनी कुलकर्णी, समन्‍वयक, आरोग्‍य साहाय्‍य समिती, गोवा

३. नवीन शिक्षणपद्धतीमध्‍ये भारताचे उत्‍थान करणार्‍या शिक्षणपद्धतीचा समावेश करावा ! – सद़्‍गुरु (डॉ.) चारूदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

४. कोरोना महामारीच्‍या काळात हिंदु विधीज्ञ परिषदेने जनहित याचिका प्रविष्‍ट करून पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवला ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय, बेंगळुरू

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा द्रष्‍टेपणा ! – मागील ४-५ वर्षे सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले हे वारंवार ‘आपत्‍काळ येणार आहे’, असे सांगत असत. कोरोेना महारारीमुळे केवळ भारतातच नव्‍हे, तर जगभरात जी स्‍थिती उद़्‍भवली आहे, त्‍यावरून ‘परात्‍पर गुरुदेवांनी या आपत्‍काळाविषयी आपल्‍याला आधीच सांगितले होते’, हे आपल्‍या लक्षात येते.  – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी.

Leave a Comment