शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

  • शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ साधना शिबिराचे आयोजन 
  • आदर्श शिक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करणारी सनातन संस्था !

कोल्हापूर – शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा अन् मार्गदर्शन करतात. पालकांच्या शब्दांपेक्षा शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांसाठी बहुमूल्य असतात. विद्यार्थ्यांना येत असलेला अभ्यासाचा अथवा परीक्षेचा ताण केवळ साधनेनेच अल्प होऊ शकतो, ही अनुभूती अनेक साधक शिक्षकांनी घेतली आणि आताही घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पालट घडवणे शक्य आहे. यांद्वारे  त्यांना प्रामाणिक आणि सुजाण नागरिक सिद्ध करता येईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

या शिबिरासाठी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, तसेच गोवा राज्यातील असे एकूण १२५ शिक्षक सहभागी झाले होते. शिबिराचा उद्देश सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी सांगितला. शिबिरात काही शिक्षक साधकांनी त्यांचे मनोगत, तर काहींनी शिबिरात काय शिकायला मिळाले, याविषयी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment