सनातनच्या साधिकांकडून तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिलांचे औक्षण !

देवद (पनवेल) – येथील सनातनच्या आश्रमात ग्रामस्थ मंडळाच्या वतीने काढण्यात येणार्या अखंड हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही आगमन झाले. हे दिंडीचे २१ वे वर्ष आहे. ह.भ.प. गणेश महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार दिंडीचे आयोजन केले जाते. दिंडीच्या माध्यमातून षड्रिपू निर्मूलन आणि व्यसन निर्मूलन यांच्या संदर्भात कार्य केले जाते. आश्रमात दिंडीचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विणेकरींचे औक्षण, तसेच पाद्यपूजन सनातनचे साधक श्री. अविनाश गिरकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी केले. तुळशी वृंदावन आणि कलश मस्तकावर वाहून आणलेल्या वारकरी महिलांचे पाद्यपूजन आणि औक्षण सनातनच्या साधिका सौ. मीनल शिंदे आणि सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देवद गावातील अनेक वारकरी ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी आश्रमाच्या वतीने वारकरी बांधवांना प्रसाद देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी उपस्थितांना संबोधित केले.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...