श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सर्व साधकांनी प्रतिदिन १०८ वेळा ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र म्हणावा !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीत करण्यात आलेल्या उल्लेखाप्रमाणे सर्वत्र असलेल्या सनातनच्या साधकांना युद्धकाळासाठी श्रीकृष्णाचे आणि रामराज्यासाठी श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होणे आवश्यक आहे. कलियुगात महर्षि नारदांमुळे सर्व मानवजातीसाठी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’ हा महामंत्र मिळाला.

सध्या साधक करत असलेल्या नियमितच्या नामजपांसह यापुढे वरील महामंत्र प्रतिदिन १०८ वेळा म्हणावा. या महामंत्राला स्थळकाळाचे बंधन नाही. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवतांची तत्त्वे असल्याने सर्व साधकांनी हा महामंत्र म्हणतांना गुरुदेवांचे स्मरण करावे.

– सप्तर्षी जीवनाडी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी केलेले नाडीवाचन, २०.१०.२०२५)

 

Leave a Comment