
चेन्नई (तमिळनाडू), १६ ऑगस्ट (वार्ता.) – येथे विश्व वारकरी संस्थानाने एका भावपूर्ण सोहळ्याद्वारे संत ज्ञानेश्वर महाराजांची ७५० वी जयंती साजरी केली. सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डाॅ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. तसेच तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात ७५० वारकर्यांनी माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरीचे पठण केले. सोहळा शहरातील आड्यार भागात असलेल्या श्री आनंद पद्मनाभ स्वामी मंदिरात पार पडला
Chennai witnessed the 750th Jayanthi Mahotsav of Sant Dnyaneshwar Maharaj, celebrated by Vishwa Varakari Samsthan.
Inaugurated by Shri Chitshakti (Mrs) Anjali Gadgil of @SanatanSanstha & graced by TN Governor R.N. Ravi (@rajbhavan_tn)
For 30+ yrs, the Samsthan has spread… pic.twitter.com/TTNPolkpHw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 16, 2025

सोहळ्याचा शुभारंभ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच डॉ. श्री रघुनाथदास महाराज यांच्या मातोश्री गुरुमाता मीनालोचनी, डॉ. श्री रघुनाथदास महाराज आणि त्यांच्या पत्नी सौ. शुभलक्ष्मी यांच्या मंगलहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी ‘विश्व वारकरी संस्थाना’चे उत्तराधिकारी डॉ. श्री रघुनाथदास महाराज लिखित ‘राजविद्या’ (ज्ञानेश्वरीतील ९ व्या अध्यायावर भाष्य), तसेच ‘ज्ञानोत्तर भक्ती’ (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीचे गुह्य) या ग्रंथांचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि आर्.एन्. रवि यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. श्री रघुनाथदास महाराजांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

‘विश्व वारकरी संस्थाना’चे कार्य !
विश्व वारकरी संस्थान गेली ३० वर्षे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा जगभर प्रचार-प्रसार करत आहे. यांतर्गत संस्थानाने आतापर्यंत तमिळनाडू राज्यातील १५ सहस्र लोकांना अभंग, तसेच ज्ञानेश्वरीचे पठण यांचे प्रशिक्षण दिले आहे. जगभरातील ५ लाख तमिळ भक्त हे संस्थानाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात.
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...