प.पू. डॉ. आठवले आणि सनातनचे विविध संत यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांच्या चित्रांविषयी काढलेले उद्गार
उमाक्कांनी काढलेल्या ‘कृष्णमय’ चित्रांतून साधिकेचा उत्कट भाव, दृढ श्रद्धा इत्यादी अनेक आध्यात्मिक गुण प्रकर्षाने जाणवतात. या लेखात सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले आणि सनातनच्या विविध संतांनी ‘बालकभावा’तील या अदि्वतीय चित्रांविषयी काढलेले उद्गार दिले आहेत. यांतून अध्यात्मातील ‘भावा’चे अनन्यसाधारण महत्त्व वाचकाच्या लक्षात येईल.