आपत्कालात वाईट शक्तींच्या त्रासाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्रासावर मात करण्याचा उपाय

बरेच साधक आध्यात्मिक त्रासावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायांना बसतात. सध्या आपत्काल चालू असल्याने त्रास पूर्णतः गेला असे होणार नाही; परंतु त्रासातही आपले अनुसंधान टिकून आहे का, याकडे अधिक लक्ष दिले, तर त्रासातही साधना होईल.

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ

आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणार्‍या त्रासांची तीव्रता सर्वत्र वाढत आहे. त्यासाठी उपाय करतांना देवतांचे नामजप, मुद्रा आणि न्यास यांच्यामुळे लाभ होत नसल्यास पुढील नामजप करावा.

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या चैतन्यमय नामधून

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांना त्यांचे सर्व भक्त बाबा म्हणत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. बाबांचे गुरु. भजन, भ्रमण अन् भंडारा हे बाबांचे जीवन होते. लक्षावधी कि.मी. प्रवास करून त्यांनी अनेकांना अध्यात्ममार्गाची गोडी लावली. प.पू. बाबांनी १७.११.१९९५ या दिवशी इंदूर येथे देहत्याग केला.

सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी गायलेली भावगीते आध्यात्मिक उपायांसाठी उपयुक्त !

सनातनचे २४ वे संत पू. नंदकुमार जाधव (पू. जाधवकाका) यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. ते बालवयापासून भावगीते वगैरे गात असत. साधनेत आल्यावर ईश्वराप्रती वृद्धिंगत झालेल्या भावामुळे त्यांच्या आवाजात होत गेलेला पालट, त्या गायनाचा समष्टीवर होणारा परिणाम, संतांच्या वाणीतील चैतन्यामुळे ती आध्यात्मिक उपाय करण्यात उपयुक्त कशी आहेत आणि पर्यायाने साधनेचे महत्त्व यांविषयी आपण प्रस्तूत लेखातून जाणून घेऊया.

नामजप : व्याधींवरील उपाय

प्रस्तूत लेखात आपण नामजपाचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ काय आहेत हे पाहूया. मनुष्याच्या इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास त्यावर उपाय म्हणून नामजप करू शकतो.

अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे नामजप

अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे विविध नामजप कोणते आणि नामजपाने खर्‍या अर्थाने आचारांचे पालन कसे करता येते यांविषयी या लेखातून जाणून घेऊया.

मानस सर्व देहशुद्धी

काहीही न सुचणे, चिडचीड होणे, प्रचंड थकवा येणे. यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांवर ताण येतो. यांसारख्या सर्वच समस्यांवर मानस सर्व देहशुद्धी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

आध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामसाधना.

नामजप

नामजप करतांना स्थळ-काळाचे कोणत्याही प्रकारे बंधन येत नाही. त्यामुळे आपल्याला २४ घंटे (तास) नामसाधना करता येते. म्हणजेच ईश्वराशी अखंड अनुसंधान राखणे शक्य होते.