
येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बहुप्रतिक्षित असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणीचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदु समाजाने प्रतीदिन एखादी वेळ ठरवून कुटुंबियांसह श्रीरामाचा जप करावा, रामराज्याची स्थापना व्हावी यासाठी श्रीरामाला मनोभावे प्रार्थना करावी, सर्वगुणसंपन्न अशा श्रीरामाचे आदर्श गुणांचे चिंतन करून आपण ते आत्मसात करण्यासाठी नित्य प्रयत्न करावेत, यासह या प्रकरणी जो निकाल येईल, तो समाजस्वास्थ उत्तम ठेवत स्वीकारावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे.
या प्रकरणी काही विघ्नसंतोषी समाजघटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तरी श्रीरामावर श्रद्धा ठेवत संयमाने वागावे आणि शासन-प्रशासनास सहकार्य करावे. श्रीरामाच्या नामामध्ये खूप शक्ती असल्याने अधिकाधिक जणांनी समाजाला श्रीरामाचा नामजप करण्याचे आवाहन करावे. त्याच्यावर श्रद्धा ठेवून कृती केल्यास त्याच्या नामाची अनुभूती निश्चितच रामभक्ताला येते. ती अनुभूती घेण्याचा प्रयत्न हिंदु समाजाने करावा, असेही श्री. राजहंस यांनी म्हटले आहे.
आपला नम्र,
श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
गौतम खट्टर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन सनातन संस्थेने केले नव्हते !
जैन मंदिरांना सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरून वादंग निर्माण करणे चुकीचे ! – अभय वर्तक,...
पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन !
पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन !
सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा सिद्ध; ‘हिंदु दहशतवादा’च्या षड्यंत्राचा पर्दाफाश