अग्निहोत्र
मानवाचे रक्षण करणारा एक पवित्र यज्ञ
सोप्या मंत्रोच्चारांसहित दिलेल्या आहुतींद्वारे वातावरण, मन आणि आत्मा यांची शुद्धी करणाऱ्या या प्राचीन शक्तीशाली यज्ञाचा अनुभव घ्या.
अग्निहोत्र करण्याचे लाभ
किरणोत्सर्गापासून संरक्षण
किरणोत्सर्गापासून, तसेच अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षण करते.
वातावरणाचे शुद्धीकरण
वायू शुद्ध करून प्रदूषण अल्प करते आणि वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढवते.
नकारात्मक स्पंदने नष्ट होणे
वातावरणातील नकारात्मक स्पंदनांपासून रक्षण होत असल्याने मानसिक ताण दूर होतो आणि सात्त्विक स्पंदनांत वृद्धी होते.
निसर्ग आणि वास्तु यांना पूरक असणे
निसर्ग संतुलित करून त्या स्थानातील पर्यावरणातील असंतुलन दूर करते.
रोगजंतूंचे निरोधन
अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो.

पर्यावरण आणि शेतीसाठी लाभदायक
औषधीय, तसेच चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करते. अग्निहोत्राची रक्षा (राख) मातीची सुपीकता वाढवते, पिकांची वाढ चांगली करते आणि धान्य, फळे, भाज्या यांचे पोषणमूल्य सुधारते.

मानसिक स्वास्थ्य सुधारणे
अग्निहोत्रामुळे मन शांत आणि तणावमुक्त होते, इच्छाशक्ती वाढते, तसेच व्यसनांवर मात करण्यासाठी साहाय्य होते, मुलांच्या वागणुकीत चांगले पालट दिसून येतात, त्यांची एकाग्रता वाढते आणि सर्व वयोगटातील लोकांचे भावनिक स्थैर्य वाढवते.

आध्यात्मिक आणि संरक्षक ऊर्जा देणे
अग्निहोत्रामुळे दैवी संरक्षक-कवच निर्माण होते, देवतांची सूक्ष्म शक्ती आकृष्ट होते, अध्यात्मिक प्रगतीस अनुकूलता मिळते. प्राणशक्तीची शुद्धी होऊन मन आनंद आणि ध्यानावस्था अनुभवते. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते.
अग्निहोत्राच्या ४ सोप्या कृती

आवश्यक साहित्य गोळा करणे
गायीच्या गोवऱ्या, गायीचे तूप, अखंड तांदूळ (अक्षता) आणि विशिष्ट आकाराचे (पिरॅमिड) तांब्याचे हवन पात्र.

योग्य वेळा पाळणे
स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेतच अग्निहोत्र करावे.

वैदिक मंत्र म्हणणे
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांसाठी दिलेले विशिष्ट मंत्र म्हणावेत.

अक्षतांची आहुती देणे
तुपात भिजवलेल्या अक्षतांची मंत्रोच्चार करत अग्नीत आहूती द्यावी.

आवश्यक साहित्य गोळा करणे
गायीच्या गोवऱ्या, गायीचे तूप, अखंड तांदूळ (अक्षता) आणि विशिष्ट आकाराचे (पिरॅमिड) तांब्याचे हवन पात्र.

योग्य वेळा पाळणे
स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेतच अग्निहोत्र करावे.

वैदिक मंत्र म्हणणे
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांसाठी दिलेले विशिष्ट मंत्र म्हणावेत.

अक्षतांची आहुती देणे
तुपात भिजवलेल्या अक्षतांची मंत्रोच्चार करत अग्नीत आहूती द्यावी.
कोणते मंत्र म्हणावेत ?
सूर्योदयाच्या वेळी म्हणायचा मंत्र:
सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतय इदं न मम ।
सूर्यास्ताच्या वेळी म्हणायचा मंत्र:
अग्नये स्वाहा, अग्नय इदं न मम ।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतय इदं न मम ।
सत्संग – जिथे अध्यात्माला विज्ञानाची जोड दिली जाते
प्राचीन ज्ञान आणि आधुनिक साधने यांची सांगड घालून जीवन समृद्ध करणाऱ्या या समूहात आपले स्वागत आहे. सनातन हिंदु धर्मातील गूढ आणि गहन ज्ञानाचा अभ्यास आणि त्याप्रमाणे दैनंदिन जीवनात आचरण केल्यास होणारा सकारात्मक बदल अनुभवण्यासाठी आमच्यासोबत जोडा.
अध्यात्म आणि हिंदु संस्कृती यांविषयी असलेले ज्ञान विस्तारण्यासाठी आमच्या विनामूल्य ऑनलाइन सत्संगांमध्ये सहभागी व्हा किंवा अधिक जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

















