१. उद्देश
या संस्काराने आईच्या गर्भात असतांना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो.
२. मुहूर्त
मुलास सहावा किंवा आठवा मास आणि कन्येस पाचवा किंवा इतर विषम मास अन्नप्राशनास योग्य आहेत. (सम संख्या पुरुषवाचक, तर विषम संख्या स्त्रीवाचक असतात.)
३. संकल्प
‘माझ्या बालकाला मातेच्या गर्भातील मलाचे प्राशनापासून झालेल्या दोषांचा नाश, शुद्ध अन्न इत्यादीकांची प्राप्ती, ब्रह्मवर्चसाचा (तेजाचा) लाभ, इंद्रिये आणि आयु यांची सिद्धी, बीजगर्भापासून झालेल्या पापांचे निरसन यांद्वारे श्री परमेश्वराची प्रीती होण्याकरिता ‘अन्नप्राशन’ नावाचा संस्कार करतो. त्याचे अंगभूत श्री गणपतिपूजन, स्वसि्तवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करतो.’
४. विधी
संकल्प झाल्यावर देवतेच्या पुढे आपल्या उजवीकडे शुभ्र वस्त्रावर आईच्या मांडीवर पूर्व दिशेला तोंड करून बसलेल्या बालकास प्रथम अन्नप्राशन करवावे. दही, मध, तूप यांनी युक्त असे अन्न सोन्याच्या अथवा काशाच्या पात्रात ठेवून ‘हे अन्नपते ईश्वरा, आम्हाला आरोग्यकारक आणि पुष्टीदायक अन्न दे’, असे म्हणून सुवर्णयुक्त हस्ताने (हातात सोने घेऊन) अन्न घेऊन पहिला घास द्यावा. मग पोटभर जेवण झाल्यावर मुख धुऊन बालकाला भूमीवर बसवावे.
५. जीविकापरीक्षा
बालकापुढे पुस्तके, शस्त्रे, वस्त्रे इत्यादी वस्तू उपजीविकेची परीक्षा करण्यासाठी ठेवाव्या. बालक स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथमतः हात लावील, ते पुढे त्याचे उपजीविकेचे साधन होईल, असे समजावे.

विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व
हिंदु धर्मातील विवाह संस्कार आणि त्याचे महत्त्व !
मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे !
उपनयन (व्रतबंध, मुंज)
चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे)