रक्षाबंधन (Rakshabandhan 2023)

रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमा या तिथीला साजरा केला जातो. या दि‍वशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भाऊ आणि बहीण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते, त्याचप्रमाणे त्यांच्यातील देवाण-घेवाणही न्यून होत असतो. त्यामुळे हा सण भाऊ आणि बहीण या दोघांना ईश्वराकडे घेऊन जाणारा ठरतो.

 ३०.८.२०२३ या दिवशी योणाऱ्या रक्षाबंधन सणाला भद्रापुच्‍छाची वेळ सायंकाळी ५.१८ ते ६.३० अशी आहे. त्‍यामुळे या वेळेत रक्षाबंधन करावे.

रक्षाबंधन असा साजरा करा !

हे करा !

  • भावाने बहिणीच्या घरी जावे.
  • बहिणीने भावाचे औक्षण करून त्याला निःस्वार्थपणे राखी बांधावी.
  • बहिणीने भा‍वाला नमस्कार करून त्याचे आशीर्वाद घ्यावे.
  • भावाने बहिणीला सा‌त्त्विक ओवाळणी द्यावी.
  • प्रार्थना करावी.

हे करू नये !

  • भावाला देवतांची चित्रे असलेल्या राख्या बांधू नका.
  • बहिणीने राखी बांधतांना भावाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
  • भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये.

रक्षाबंधनाच्या दि‍वशी हे करा !

  • भावाने बहिणीच्या घरी जावे.
  • बहिणीने भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधावी.
  • बहिणीने भा‍वाला नमस्कार करावा.
    हा दिवस बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. बहिणीने आपल्या भावाला निःस्वार्थीपणाने राखी बांधल्यास आणि त्याचे आशीर्वाद घेतल्यास बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब न्यून होण्याचे प्रमाण वाढते.
  • भावाने बहिणीला सा‌त्त्विक ओवाळणी द्यावी.
    रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देतो. भेटवस्तू दिल्याने एकमेकांची आठवण रहाते. भावाप्रती बहिणीच्या असलेल्या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेम देऊन ते न्यून करू शकतो. हे तो स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न करत असतो. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्वराप्रती भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास बहिणीने ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते.
    सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० प्रतिशत आणि घेणार्‍या जिवाला १८ प्रतिशत लाभ होतो. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.
  • प्रार्थना करावी.
    येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
    तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
    अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
    बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.

रक्षाबंधनाच्या दि‍वशी हे करू नये !

  • भावाला देवतांची चित्रे असलेल्या राख्या बांधू नका.
    ​राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा ! आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. त्यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !
  • बहिणीने राखी बांधतांना भावाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
    आजकाल बहिणी भावांना काय भेट वस्तू पाहिजे ते आधीच सांगून ठेवतात आणि ती मिळण्यासाठी आग्रही असतात. असे मनात इच्छा अथवा अपेक्षा बाळगल्यास बहिण त्या दिवशी मिळणाऱ्या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते. हा दिवस बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात. अपेक्षेमुळे त्या दिवशी वातावरणात असलेल्या प्रेम आणि आनंद यांच्या लहरींचा लाभ करून घेता येत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या १२ प्रतिशत हानी होते.
  • भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये.
    ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते, तसेच शनीची बहीण भद्रा हिचा प्रभावही हानीकारक असतो. भद्रेच्या कुदृष्टीमुळे कुळाची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये (संदर्भ : धर्मसिंधु). रावणाने भद्राकाळात शूर्पणखेकडून राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याचा त्याच्या कुळासहित नाश झाला.

हे करा !

  • भावाने बहिणीच्या घरी जावे.
  • बहिणीने भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधावी.
  • बहिणीने भा‍वाला नमस्कार करावा.
    हा दिवस बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. बहिणीने आपल्या भावाला निःस्वार्थीपणाने राखी बांधल्यास आणि त्याचे आशीर्वाद घेतल्यास बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब न्यून होण्याचे प्रमाण वाढते.
  • भावाने बहिणीला सा‌त्त्विक ओवाळणी द्यावी.
    रक्षाबंधन या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देतो. भेटवस्तू दिल्याने एकमेकांची आठवण रहाते. भावाप्रती बहिणीच्या असलेल्या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेम देऊन ते न्यून करू शकतो. हे तो स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न करत असतो. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्वराप्रती भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास बहिणीने ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे सोयीस्कर आणि उपयुक्त ठरते.
    सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० प्रतिशत आणि घेणार्‍या जिवाला १८ प्रतिशत लाभ होतो. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब न्यून होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.
  • प्रार्थना करावी.
    येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
    तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
    अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
    बहिणीने भावाच्या कल्याणासाठी आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.

हे करू नये !

  • भावाला देवतांची चित्रे असलेल्या राख्या बांधू नका.
    राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा ! आजकाल रक्षाबंधन या सणाला राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता आणि धर्मप्रतीक यांचे विडंबन होते. त्यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !
  • बहिणीने राखी बांधतांना भावाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये.
    आजकाल बहिणी भावांना काय भेट वस्तू पाहिजे ते आधीच सांगून ठेवतात आणि ती मिळण्यासाठी आग्रही असतात. असे मनात इच्छा अथवा अपेक्षा बाळगल्यास बहिण त्या दिवशी मिळणाऱ्या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते. हा दिवस बहिण-भावातील देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात. अपेक्षेमुळे त्या दिवशी वातावरणात असलेल्या प्रेम आणि आनंद यांच्या लहरींचा लाभ करून घेता येत नाही. आध्यात्मिक दृष्ट्या १२ प्रतिशत हानी होते.
  • भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये.
    ज्याप्रमाणे शनीची क्रूर दृष्टी हानी करते, तसेच शनीची बहीण भद्रा हिचा प्रभावही हानीकारक असतो. भद्रेच्या कुदृष्टीमुळे कुळाची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्राकाळात राखी बांधून घेऊ नये (संदर्भ : धर्मसिंधु). रावणाने भद्राकाळात शूर्पणखेकडून राखी बांधून घेतली आणि त्याच वर्षी त्याचा त्याच्या कुळासहित नाश झाला.

३० ऑगस्‍ट २०२३ या दिवशी रक्षाबंधन करण्‍याचा मुहूर्त

‘सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक असणारी आणि भद्रा (टीप) रहित अशा श्रावण पौणिर्मेच्‍या दिवशी अपराण्‍हकाळी किंवा प्रदोषकाळी रक्षाबंधन करावे’, असे धर्मशास्‍त्रात सांगितले आहे.

टीप – ‘विष्‍टि’ नामक करणाला भद्रा म्‍हणतात. करण म्‍हणजे तिथीचा अर्धा भाग. भद्रा करण अशुभ मानले जाते.

अ. ३१.८.२०२३ या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी ७.०६ वाजता संपणार आहे. ती सूर्योदयापासून ६ घटिकांहून (१४४ मिनिटांहून) अधिक वेळ नाही; त्‍यामुळे ३१.८.२०२३ या दिवशी रक्षाबंधन करता येणार नाही.

आ. ३०.८.२०२३ या दिवशी सकाळी १०.५९ वाजता पौर्णिमा प्रारंभ होत आहे. या दिवशी भद्राकाळ हा सकाळी १०.५९ ते रात्री ९.०२ या कालावधीत असल्‍याने या वेळेतही रक्षाबंधन करता येणार नाही.

इ. अशा वेळी भद्राकाळातील ‘भद्रापुच्‍छ’ या मुहूर्ताद्वारे ही अडचण सुटू शकते. ‘भद्राकाळातील भद्रापुच्‍छ हा काळ प्रसंगविशेषी शुभ समजावा’, असे मुहूर्त ग्रंथांमध्‍ये लिहिले आहे.

ई. ३०.८.२०२३ या दिवशी भद्रापुच्‍छाची वेळ सायंकाळी ५.१८ ते ६.३० अशी आहे. त्‍यामुळे या वेळेत रक्षाबंधन करावे.’

– श्री. राज कर्वे (ज्‍योतिष विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (२८.८.२०२३)

भावाला देवतांच्या चित्र असलेल्या राख्या बांधू नका !

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीमधील प्रेम वृद्धिंगत करणारा असला तरी तो त्यांच्यामधील देवाण-घेवाण राखीच्या माध्यमातून कमी करण्यास साहाय्य करणारा आहे. विविध सण साजरे करण्यामागील गूढार्थ समजून घेऊन ते साजरे केल्यास आपल्याला त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी…

सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

रक्षाबंधन : इतिहास

१. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

२. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : ‘जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.’

३. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.

४. प्राचीन काळातील राखी

तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।


अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

राखी बांधण्यामागील शास्त्र

बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे

बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० प्रतिशत देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून न्यून होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात.

आध्यात्मिक दृष्टीकोण : पुरुषांमध्ये कार्यरत यमलहरींना आळा घालणारी राखी

राखी पौर्णिमा अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते. या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढते, आणि यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. शक्तीबीजरूपी बहिणीने राखी बांधल्याने पुरुषातील शिव-तत्त्व जागृत होते. यामुळे त्याची सुषुम्नानाडी काही अंशी जागृत होते. त्यामुळे राखीचे बंधन घातल्याने प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना, तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सूर्यनाडीला शांत करता येते.’ – एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी १.४५)

भावनिक दृष्टीकोण : भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम आणि क्रोध निष्प्रभ होणे

‘रक्षाबंधन हे विकारांमध्ये पडणार्‍या तरुण-तरुणींसाठी एक व्रत आहे. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पालटतो.

एक मुलगी शेजारच्या मुलाकडे वाईट दृष्टीने पाहात होती. ती मुलगी बुद्धीमान होती. तिच्या मनात विचार आला, ‘माझे मन मला धोका तर देणार नाही ना !’ ती एक राखी घेऊन आली आणि तिने त्याला राखी बांधली. त्या वेळी मुलाच्याही मनात विचार आला, ‘अरे, मीही तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहात होतो. ताईने माझे कल्याण केले.’

भावा-बहिणीचे हे पवित्र बंधन तरुण-तरुणींना विकारांच्या गर्तेत पडण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे. भाऊ-बहिणीच्या निर्मळ प्रेमापुढे काम शांत होतो. क्रोधाचेही शमन होते आणि समतायुक्त विचारांचा उदय होऊ लागतो.

रक्षाबंधन हे पर्व समाजातील तुटलेल्या मनांना जोडण्याची एक सुसंधी आहे. याच्या आगमनाने कुटुंबातील आपापसातील कलह शांत होऊ लागतात. दुरावा दूर होऊ लागतो आणि सामूहिक संकल्पशक्ती साकार होऊ लागते. – ऋषी प्रसाद, ऑगस्ट २००९

रक्षाबंधन या सणाविषयी सूक्ष्म ज्ञान

‘तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन सिद्ध करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतीमान वहन करण्यात अग्रेसर आहे. कृतीच्या स्तरावर प्रत्यक्ष कर्म घडण्यासाठी हे रेशमी बंधन प्रत्यक्ष सिद्ध केले जाते. राखी बांधणार्‍या जिवातील शक्तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून शिवरूपी जिवाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातील शिवतत्त्व जागृत होते. तांदुळाच्या कणांच्या माध्यमातून शिवातील क्रियाशक्ती कार्यरत होऊन वायूमंडलात कार्यलहरींचे गतीमान प्रक्षेपण करून वायूमंडलातील रज-तमकणांचे विघटन करते. अशा रितीने रक्षाबंधनाचा मूळ उद्देश शिव आणि शक्ती यांच्या संयोगाने साध्य करून या दिवसाचा लाभ मिळवणे मानवजातीच्या दृष्टीने जास्त इष्ट ठरते.’

– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १८.८.२००५, दुपारी १२.३६)

स्थूल कृतीमहत्त्व (प्रतिशत)कशाचे दर्शक ?
१. भावाने बहिणीच्या घरी जाणे१०प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृती : ही कृती म्हणजे पुरुषत्वाद्वारे (शिवत्वाद्वारे) स्त्रीत्वाला (शक्तीला) प्रत्यक्ष कार्याच्या जागृतीसाठी ब्रह्मस्थितीत आवाहन करणे
२. बहिणीने भावाचे औक्षण करणे२०प्रत्यक्ष जागृतीत्मक आवाहनदर्शक कृती : ही कृती म्हणजे शिवत्वाला प्रत्यक्ष क्रियालहरींद्वारे स्वस्वरूपाला ब्रह्मस्थितीतील क्रियेत जागृत होण्यासाठी आवाहन करणे
३. बहिणीने राखी बांधणे३०प्रत्यक्ष जागृतीसाठी क्रियाप्रदत्तदर्शक कृती : प्रत्यक्ष जागृती येण्यासाठी स्वतःच्या क्रियालहरी सगुणाच्या स्वरूपात शिवतत्त्वाला देणे आणि या माध्यमातून शिवत्वाला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी अस्तित्वदर्शक क्रिया प्रदान करणे
४. बहिणीने नमस्कार करणे२०प्रत्यक्ष द्वैतदर्शक कृती : पुरुषत्वात जागृत झालेल्या कार्यरूपी शिवाला प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी शक्तीस्वरूपाने नमन करून त्याला प्रत्यक्ष चालना देणे
५. भावाला जेवण वाढणे किंवा भावाने भेट देणे इत्यादी२०प्रत्यक्ष क्रियेच्या स्तरावर असलेल्या प्रेमदर्शक कृती : द्वैतस्तराचे अस्तित्व निर्माण झाल्यामुळे द्वैतातील क्रिया म्हणजेच सगुण स्वरूपात प्रेमदर्शक कृती
एकूण१०० 
– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.७.२००६, दुपारी २.४०)

बहिणीच्या भक्तीभावानुसार भावाला लाभ होतो.

अ. या दिवशी श्री गणेश आणि श्री सरस्वतीदेवी यांचे तत्त्व पृथ्वीतलावर अधिक प्रमाणात येते आणि त्याचा दोन्ही जिवांना अधिक प्रमाणात लाभ होतो.

आ. राखी बांधतांना स्त्री जिवातील शक्तीचे तत्त्व प्रगट होऊन पुरुष जिवाला हातातून मिळते आणि त्याला ५ घंट्यापर्यंत २ प्रतिशत लाभ होतो.

इ. बहिणीचा भक्तीभाव, तिची ईश्वराप्रती तळमळ आणि तिच्यावर असलेली गुरुकृपा जितकी अधिक, तितका तिने भावासाठी मारलेल्या हाकेवर परिणाम होऊन भावाची अधिक प्रमाणात प्रगती होते.

संदर्भ ग्रंथ

वरील माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून घेतली आहे. रक्षाबंधन प्रमाणे अन्य सणांची माहिती जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचा.

बहिणीला अनमोल ग्रंथ भेट द्या !

व्‍यक्‍तीमत्त्व-विकास

स्वभावदोष (षड् रिपू) – निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

कला

सात्त्विक मेंदी

संस्कार

अभ्यास कसा करावा ?

रक्षाबंधन संबंधी व्हिडीओ पहा !