अद्वितीय सूक्ष्म ज्ञान

मानवाला सूक्ष्म ज्ञानासंबंधीच्या पैलूंची दृश्यस्वरूपात ओळख करून देणारे एकमेव सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले !

‘अध्यात्म हे खरे पहाता सूक्ष्मातील म्हणजे, स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील शास्त्र आहे. सर्वसामान्य व्यक्तीची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता नसल्याने तिला अध्यात्मातील सूक्ष्म-जगतासंबंधी काहीच ठाऊक नसते. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले यांनी या सूक्ष्म जगताचे ज्ञान प्रथम स्वतः अनुभवले आणि मग इतर साधकांनाही ते शिकवले. सूक्ष्मासंबंधीच्या विविध पैलूंची ओळख करून घेऊया.

सूक्ष्म ज्ञान म्हणजे काय?

सूक्ष्म ज्ञान म्हणजे स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्यापलीकडील ज्ञान. एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा घटनेच्या स्पंदनांचा अनुभव घेणे म्हणजे सूक्ष्म ज्ञान. हे ज्ञान पंचज्ञानेंद्रिये न वापरता प्राप्त केले जाते. मनाचे संस्कार, पूर्वग्रह किंवा आवड-नावड बाजूला ठेवून ‘रिक्त मनाने’ म्हणजे निर्विचार स्थितीने जे अनुभवले जाते, ते सूक्ष्म ज्ञान असते.

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांना हे सूक्ष्म ज्ञान कसे प्राप्त झाले?

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले सूक्ष्मातील असंख्य प्रयोग आणि अभ्यास करून सूक्ष्मातील कळण्याचे तंत्र विकसित केले अन् पुढे ते साधकांनाही शिकवले. यामुळे आज सनातनच्या अनेक साधकांना सूक्ष्मातील अचूक जाणता येते आणि काही साधकांना अद्वितीय असे ईश्वरी ज्ञान सूक्ष्मातून ग्रहण करता येते.
पुढे याच ज्ञानाचे त्यांनी विवेचन केले आणि शेकडो ग्रंथांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवले.

इतर साधकांना हे सूक्ष्म ज्ञान कसे शिकवले?

सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना सूक्ष्म जगताचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले. सूक्ष्म परीक्षण करतांना लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तेव्हा आपले मन निर्विचार हवे. त्यानंतरच त्या व्यक्तीची स्पंदने आपल्याला अचूक कळतात. मन निर्विचार असले की, आपल्या मनात त्या व्यक्तीविषयीच्या पूर्वानुभवामुळे तिच्याविषयी चांगले किंवा वाईट विचार येत नाहीत आणि त्यामुळे आपले सूक्ष्म परीक्षण बरोबर येते. तसेच मन निर्विचार ठेवल्यास एखादी कनिष्ठ किंवा अनिष्ट शक्ती आपल्याला उत्तर देत नाही, तर ईश्वराकडून उत्तर मिळते, म्हणजे ते विश्वमन आणि विश्वबुद्धी यांकडून आलेले असते.’ (१.८.२०११). साधना करून मनाचे संस्कार कमी केल्यास हे ज्ञान अधिक अचूकपणे प्राप्त होते. डोळे बंद करून, नामजपाने मन निर्विचार ठेवल्यास सूक्ष्म परीक्षण करता येते.

सूक्ष्म ज्ञानाची वैशिष्ट्ये

एखाद्या विषयाला जाणण्यासाठी निवळ त्याच्या स्थूलरूपाची ओळख करून घेतली, तर ती अपूर्ण असते. विषयाचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्याच्यातील सूक्ष्म-पैलूंचे ज्ञान हवे. मनुष्याचे डोळे, मन आणि बुद्धी यांनी एखाद्या विषयातील स्थुलातील भाग कळतो, तर साधनेने सक्षम झालेले सूक्ष्म मन आणि सूक्ष्म बुद्धी यांना त्यातील सूक्ष्मातील भाग कळू शकतो. हे ज्ञान कोणत्याही व्यक्तीच्या रूपरंगाच्या पलीकडे जाऊन तिच्या अंतरात्म्याच्या स्थितीची माहिती देते.

सूक्ष्म ज्ञान प्राप्तीसाठी साधना आवश्यक

सूक्ष्म ज्ञान हे केवळ वाचन किंवा ऐकण्याने मिळत नाही. त्यासाठी साधना आवश्यक आहे. नामजप, सत्संग, सेवा, स्वभावदोष निर्मूलन, भावजागृती यांमुळे मन शुद्ध होते आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्त करण्याची पात्रता निर्माण होते. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले यांनी दाखवलेली ही वाट प्रत्येकासाठी खुली आहे. ज्यांना सत्य शोधायचे आहे, ईश्वराला अनुभवायचे आहे, त्यांनी ही वाट अवश्य चालायला सुरुवात करावी.

सूक्ष्मातील उत्तरे प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे घटक

अ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी

आ. सूक्ष्मातील स्पंदने ग्रहण करण्याची पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांची क्षमता

इ. सूक्ष्मातील स्पंदनांचे विश्‍लेषण करून त्यामागे असणार्‍या कार्यकारणभावाविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धीची सात्त्विकता

स्थूलरूप जाणणे आणि सूक्ष्म-पैलू जाणणे यातील अंतर !

डोळे

पंचज्ञानेंद्रियांमधील एक म्हणजे आपले डोळे. डोळ्यांनी विषयाच्या स्थूलरूपाची ओळख होते. विषयाचे स्थुलातील घटक म्हणजे त्याचे रूप, आकार, रंग इत्यादी माध्यमांतून कळतात. मन आणि बुद्धी यांना विषयाची प्राथमिक ओळख करून देण्याचे हे माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीचे रूप, रंग, वागणे-बोलणे, राहणीमान यांवरून आपल्याला त्याची प्राथमिक माहिती मिळते.
उदा. अ नावाची व्यक्ती ही सावळ्या वर्णाची, मध्यम बांध्याची, तसेच नीटनेटकी आहे.

मन

माणसाची प्रकृती आणि गुण-दोष यांनुसार मन विषयाचे आकलन करते. बरेचदा त्या विषयासंदर्भात डोळ्यांना जे दिसते आणि बुद्धीला जे कळते, त्यावर मनाचे कळणे अवलंबून असते,
उदा. अ ही व्यक्ती सदाचरणी असल्याने तिला पाहून चांगले वाटते आणि तिचा सहवास हवाहवासा वाटतो.
बुद्धी किंवा डोळे यांनी विषयाची केवळ स्थुलातीलच माहिती मिळत असल्याने मनाला त्यांच्या आधारे जे कळते, ते नेहमीच अपुरे असते किंवा ते सत्य असतेच, असे नाही.

बुद्धी

बुद्धी मनुष्याच्या शरिराशी संबंधित आहे. प्रत्येकाची बुद्धीची क्षमता निरनिराळी असून तो त्यानुसार आणि त्याप्रमाणात विषयाचे आकलन करतो.
उदा. अ ही व्यक्ती काय व्यवसाय करते ? तिचे जन्मस्थान कोणते ? तिच्या आवडी-निवडी काय आहेत ? इत्यादी जाणून घेणे शक्य होते.

सूक्ष्ममन

विषयाच्या चांगल्या-वाईट सूक्ष्म स्पंदनांचे आकलन सूक्ष्ममन करते. जसजशी आध्यात्मिक प्रगती होते; परंतु तसे मन विश्‍वमनाशी एकरूप होऊन सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने टप्प्याटप्प्याने ग्रहण करते.
उदा. अ या व्यक्तीत भावाची स्पंदने जाणवतात. तिच्याशी बोलतांना आनंद जाणवतो. जर अ ला वाईट शक्तींचा त्रास असल्यास तिच्याकडे पाहून त्रासदायक वाटते इत्यादी. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सनातन संस्था निर्मित देवतांची चित्रे ही याच प्रक्रियेने, म्हणजेच सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास करून काढलेली आहेत. ही प्रक्रिया आध्यात्मिक कलेचा पाया आहे.

सूक्ष्मबुद्धी

सूक्ष्मबुद्धीच्या आधारे कळणे म्हणजे विश्‍वबुद्धीतून विषयासंदर्भात मिळालेले बुद्धीअगम्य ज्ञान मिळवणे.
उदा. अ या व्यक्तीची गतजन्मीची माहिती मिळणे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेच्या साधकांना २००३ पासून अखिल मानवजातीला उपयुक्त असे विविध विषयांवरचे ज्ञान मिळत आहे आणि त्या आधारे संस्थेने शेकडो ग्रंथांची निर्मिती केली आहे.

सूक्ष्मातील जाणण्याचा अभ्यास कसा करावा ?

आपल्या मनामध्ये (अंतर्मनात) वासना केंद्र, आवड-नावड केंद्र, स्वभाव केंद्र इत्यादी संस्कार केंद्रे असतात. त्या केंद्रांमधून आपल्या मनामध्ये विचारतरंग उमटत असतात. जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो, तेव्हाही आपल्या मनामध्ये आपल्या संस्कार केंद्रांनुरूप विचारतरंग मनात उमटतात, उदा. ती वस्तू आपल्याला आवडणारी असेल, तर ती आपल्याला चांगली असल्याचे वाटते. एखाद्या वस्तूविषयी आपल्या मनामध्ये पूर्वग्रह असतात. ती वस्तू बघितल्यावर त्या अनुरूपही आपल्या मनामध्ये विचार येतात. त्यामुळे एखाद्या वस्तूचे सूक्ष्मातील परीक्षण करायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनात येणार्‍या या विचारांना बाजूला सारून निरपेक्षपणे किंवा साक्षीभावाने त्या वस्तूकडे बघावे लागते. यासाठी आपल्या मनातील संस्कार केंद्रांना पडद्याआड ठेवावे लागते. त्यांचा हस्तक्षेप होऊन चालत नाही. असे करणे म्हणजे मनाच्या पलीकडील जाणणे. यासाठी आपल्याला डोळे बंद करून आपले मन एकाग्र करावे लागते; कारण समोरच्या दृश्यामुळेही मनात विचार येतात. एखाद्याने ५ मिनिटे नामजप केल्यावर त्याचे मन रिक्त होते. तो त्या वस्तूशी एकरूप होऊ शकतो आणि मग त्याला मनाद्वारे त्या वस्तूची सूक्ष्मातील स्पंदने जाणता येतात.

सूक्ष्मातील कळण्यासाठीची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

सूक्ष्म परीक्षण करतांना मनाची निर्विचार स्थिती असणे आवश्यक

‘एखाद्या व्यक्तीचे सूक्ष्म परीक्षण करतांना त्या व्यक्तीचे नाव मनातल्या मनात आठवून कोणती स्पंदने जाणवतात, हे पहायचे असते. तेव्हा अध्यात्मशास्त्रातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा नियम लागू होऊन त्या व्यक्तीचे नाव, म्हणजे शब्द आठवल्यावर तिच्याशी संबंधित इतर सर्व घटक आल्याने आपल्याला त्या व्यक्तीची स्पंदने कळतात आणि सूक्ष्म परीक्षण होते.
सूक्ष्म परीक्षण करतांना लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तेव्हा आपले मन निर्विचार हवे. त्यानंतरच त्या व्यक्तीची स्पंदने आपल्याला अचूक कळतात. मन निर्विचार असले की, आपल्या मनात त्या व्यक्तीविषयीच्या पूर्वानुभवामुळे तिच्याविषयी चांगले किंवा वाईट विचार येत नाहीत आणि त्यामुळे आपले सूक्ष्म परीक्षण बरोबर येते. तसेच मन निर्विचार ठेवल्यास एखादी कनिष्ठ किंवा अनिष्ट शक्ती आपल्याला उत्तर देत नाही, तर ईश्वराकडून उत्तर मिळते, म्हणजे ते विश्वमन आणि विश्वबुद्धी यांकडून आलेले असते.’

सूक्ष्मातील कळण्यातील टप्पे

१. ‘स्थुलातील सूक्ष्म, म्हणजे समोर दिसणार्‍या एखाद्या वस्तूतील स्पंदने कळणे
२. बाजूच्या खोलीतील एखाद्या वस्तूतील स्पंदने कळणे
३. पुढे विविध लोकांतील, उदा. भुवलोकातील, म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म कळणे
४. सूक्ष्मातीसूक्ष्म ईश्वराचे विचार कळणे’

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आत्ताच आरंभ करा !