चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

प.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उलगडलेले विश्‍वकल्याण स्वरूप !

‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्‍वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्‍वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते.

प.पू. डॉक्टरांनी अथक परिश्रम घेऊन बसवलेली ध्वनीचित्रीकरण सेवेची घडी आणि सिद्ध झालेले प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेल्या भजनांच्या ध्वनीफिती हे संस्थेचे पहिलेे उत्पादन !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या सर्व ध्वनीफितींचे आणि ध्वनीचित्रफितींचे संकलन प.पू. डॉक्टरांनी करून घेतले. हे संकलन ते स्वतः पडताळत आणि त्यातील त्रुटीही दाखवत. त्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकायला मिळायचे. त्या वेळी ते म्हणाले होते, संकलन करणारा आणि चित्रीकरण करणारा असा तयार व्हायला हवा की, तो पुढे इतरांना तयार करील !

उत्कट भाव असलेले बेंगळुरू येथील धर्माभिमानी उमेश शर्मा यांनी गाठली ६४ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चैतन्यमय भेटीचे विश्‍व श्री क्षेत्र महासंस्थानचे श्री. उमेश शर्मा यांनी उत्कट भावरूपाने वर्णन केले. त्याने सर्व धर्माभिमानी चैतन्यतुषारांत भिजले. त्यानंतर बेंगळुरू येथे प्रस्थान करण्यासाठी सभागृहातून बाहेर गेलेले श्री. शर्मा यांना पुन्हा सभागृहात बोलावून आणण्यात आले. पुढील वक्त्यांचे चालू असलेले मार्गदर्शन थांबवून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त … Read more

हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे…. – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर !

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा आणि त्यांची सध्या चालू असलेली दिशाभूल थांबावी’, असे मला वाटत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरु, संत आणि ऋषी यांनी दिलेले आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून इतके कार्य होण्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ, भक्ती आणि त्यांना मिळालेले गुरु, संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद होय.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला ईश्‍वराने दिलेली आध्यात्मिक प्रमाणपत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामाणेच शरिरात दैवी पालट होत असल्याची अनुभूती सनातनचे काही संत आणि साधक यांनीही घेतली आहे.

आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य

सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे.