लागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात ?

प्रत्येक राज्याचे शेतकीखाते, तसेच वनखाते यांमध्ये औषधी वनस्पती किंवा त्या वनस्पती कोठे मिळतात, यांविषयीची माहिती उपलब्ध असते. पुष्कळ आयुर्वेदीय महाविद्यालयांच्या रोपवाटिका असतात. स्थानिक आयुर्वेदीय महाविद्यालयांना संपर्क करूनही औषधी वनस्पती मिळवता येतील.

औषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा !

औषधी वनस्पतींच्या भोवतालचे वातावरण जेवढे सात्त्विक असेल, तेवढ्या त्या अधिक सात्त्विक बनतात. जेवढा सत्त्वगुण जास्त, तेवढेच वनस्पतींमधील औषधी गुणही वाढतात. औषधी वनस्पतींची लागवड निवळ अर्थाजनाचे साधन म्हणून नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास वनौषधी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या तसेच पडीक भूमीमध्ये, केवळ पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींची चालू शेतीतही आंतरपीक म्हणून लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात याची सूची पुढे दिली आहे.

परसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

औषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांबरोबरच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात, तर काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात.एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात.

घराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग

शहरातील सदनिकांमध्ये पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील.

वजन उचलण्याच्या योग्य पद्धती !

‘दैनंदिन कामे करतांना वा कुठे बाहेर जातांना आपल्याला अनेक प्रकारची वजने उचलावी लागतात. ती उचलतांना आपल्या शरिरावर कळत-नकळत ताण येत असतो. वजन उचलतांना ते चुकीच्या पद्धतीने उचलल्यास शरिराची हानी होऊ शकते.

शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ !

शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात.

आयुर्वेदानुसार तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचे महत्त्व

‘तांब्याच्या स्वच्छ भांड्यात २ घंट्यांपेक्षा (तासांपेक्षा) जास्त काळ ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ असे म्हणतात. ‘रसरत्नसमुच्चय’ हा आयुर्वेदातील रसशास्त्र या विषयावरील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. याच्या पाचव्या अध्यायातील ४६ व्या श्लोकात तांबे या धातूचे पुढील गुणधर्म दिलेले आहेत.

आगामी भीषण आपत्काळात आरोग्यरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा औषधी वनस्पतींची लागवड आतापासूनच करा !

आपत्काळात दळणवळणाची साधने, डॉक्टर, तयार औषधे इत्यादी उपलब्ध होतील, याची शाश्‍वती नसते. अशा वेळी आयुर्वेदीय औषधी वनस्पतींचा वापर करून आपल्याला आरोग्यरक्षण करावे लागेल.